अहमदनगर : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सारसनगरमधील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर वैदुवाडी येथे राहणाऱ्या मनपा कामगाराचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला.
बाबाजी शिंदे असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबाजी शिंदे हे मनपाच्या आरोग्य विभागातील कोंडवाडा विभागात हंगामी कामगार म्हणून कार्यरत होते.
कामामध्ये आरोग्य विभागाची असुरक्षितता असल्याने मनपाच्या हंगामी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनपाकडून साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजन करण्यात येत आहे. शहरात डेंग्यूचे प्रमाण नगण्य आहे.
जरी एखादा रूग्ण डेंग्यू सदृश्य आजाराने बाधीत आढळला तर त्यावर साध्या पध्दतीने उपचार केल्यास तो नियंत्रणात येतो. नागरिकांनी पूर परिस्थिती भागास तसेच साथीचे आजार फैलावलेल्या भागास भेट देण्याचे टाळावे, असे मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
- डाएट किंवा कोणताही जड व्यायाम न करता वजन होईल कमी, दररोज सकाळी फक्त ‘ही’ एक गोष्ट करा!
- ‘ही’ आहेत भारताची तीन महाशक्तिशाली शस्त्रे, ज्यांना पाहून चीन-पाकिस्तान काय तुर्कीसुद्धा घाबरतो!
- ५४ वर्षांनंतर कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस नव्या रूपात, रेल्वेमध्ये प्रवाशांना मिळणार ‘या’ खास सुख सुविधा
- सुंदर, स्टायलिश आणि मूडी स्वभावाच्या असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली; बिजनेस माइंडने कमवतात करोडो रुपये, पण प्रेम म्हटलं की यांना…
- गाढवाच्या कातडीपासून चीन बनवते ‘असं’ काही की…; इकडे पाकिस्तानला होतोय करोडोंचा फायदा! चीन-पाकिस्तानमधील हा व्यापार नेमका आहे तरी काय?