अहमदनगर : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सारसनगरमधील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर वैदुवाडी येथे राहणाऱ्या मनपा कामगाराचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला.
बाबाजी शिंदे असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबाजी शिंदे हे मनपाच्या आरोग्य विभागातील कोंडवाडा विभागात हंगामी कामगार म्हणून कार्यरत होते.
कामामध्ये आरोग्य विभागाची असुरक्षितता असल्याने मनपाच्या हंगामी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनपाकडून साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजन करण्यात येत आहे. शहरात डेंग्यूचे प्रमाण नगण्य आहे.
जरी एखादा रूग्ण डेंग्यू सदृश्य आजाराने बाधीत आढळला तर त्यावर साध्या पध्दतीने उपचार केल्यास तो नियंत्रणात येतो. नागरिकांनी पूर परिस्थिती भागास तसेच साथीचे आजार फैलावलेल्या भागास भेट देण्याचे टाळावे, असे मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
- थोरांताचे फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिसांना निवेदन
- केंद्रीय विश्वविद्यालयासाठी खा. लंके यांचे साकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांची घेतली भेट
- गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या साई व शनी भक्तांची मोठी संख्या, गुजरात-महाराष्ट्र रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी
- कुंडलीतील ‘या’ शक्तिशाली राजयोगामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार, पाहा तुमच्या नशिबात आहे का हा शुभ योग?
- कोरडगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, कोरडगाव येथे पोलीस चौकीस मंजूरी देण्याची मागणी