राहुरी: तालुक्याची वाट लावल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले. तुमच्या २५ वर्षांच्या सत्तेतील कर्तबगारी व माझ्या १० वर्षांतील विकासाची कामगिरी समोरासमोर ठेवून जनतेला हिशेब द्या, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले.
उंबरे येथील सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव ढोकणे होते. राहुरीची अस्मिता जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत स्वत:चे घर सोडून दुसरा उमेदवार चालू शकत नाही का, असा सवाल करत गळ्यापर्यंत आल्यावर अस्मिता आठवली. जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे सुभाष पाटील यांनी म्हणाले.

वसंतदादा पाटलांचे शिक्षण चौथीपर्यंत होते. ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले नव्हते. मात्र, त्यांना शेती, शेतकरी, कारखानदारी समजली होती. आपल्याकडे वडिलांनी वांबोरीत काढलेला कारखाना मुलगा चालवतो. तुमचे स्वत:चे कर्तृत्व काय, असा सवालही पाटील यांनी केला.बाळासाहेब गाडे, शिवाजी सागर, ज्ञानदेव क्षीरसागर यांचीही भाषणे झाली.
- पाचवी आणि आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी !
- IAS, IPS ते क्लर्क ; आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणाचा पगार किती वाढणार? वाचा डिटेल्स
- अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का
- आठवा वेतन आयोग : रंजना प्रकाश देसाई बनल्यात नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा, कोण आहेत देसाई ? पहा…
- वारसदाराची परवानगी न घेता वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकू शकतो का ? कायदेतज्ञांनी दिली मोठी माहिती













