राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले.
यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली.

महाराष्ट्रातील किल्ल्यांत सरकार हॉटेल्स उभी करून तिथे छम छम वाजवणार आहे का? हा एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, कुस्ती एकतर्फी होणार आहे, पण कदाचित त्यांना माहीत नसावे मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे, असा टोलाही खा. शरद पवार यांनी लगावला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेत खा. पवार बोलत होते.
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वेस्थानक
- तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भक्तांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून चालवली जाणार विशेष ट्रेन
- ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट !
- ३२३ बोनस शेअर्सनंतर कंपनी आता गुंतवणूकदारांना देणार २४ मोफत शेअर्स !
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरचा हफ्ता या तारखेला जमा होणार, वाचा नवीन अपडेट













