राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले.
यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली.

महाराष्ट्रातील किल्ल्यांत सरकार हॉटेल्स उभी करून तिथे छम छम वाजवणार आहे का? हा एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, कुस्ती एकतर्फी होणार आहे, पण कदाचित त्यांना माहीत नसावे मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे, असा टोलाही खा. शरद पवार यांनी लगावला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेत खा. पवार बोलत होते.
- आनंदाची बातमी ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘त्या’ 5 महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार, पहा…
- उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एसटी महामंडळाच्या बस बंद, दर वाढवत खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूटमार
- अहिल्यानगरमध्य्ये दळणाचे दर वाढले! असे आहेत गहू, ज्वारी, डाळीचे नवीन दर, 1 जूनपासून होणार अंमलबजावणी
- सासू-सुनेच्या जोडीचा भन्नाट डान्स ! सासु-सुनेचा जलवा आहे पाहण्यासारखा, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल, पहा…..
- हिंदू धर्मात पवित्र समजले जाणार ‘हे’ फळ रेल्वे प्रवासादरम्यान सोबत घेऊन जाता येत नाही ! कारण काय ?