राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले.
यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली.

महाराष्ट्रातील किल्ल्यांत सरकार हॉटेल्स उभी करून तिथे छम छम वाजवणार आहे का? हा एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, कुस्ती एकतर्फी होणार आहे, पण कदाचित त्यांना माहीत नसावे मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे, असा टोलाही खा. शरद पवार यांनी लगावला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेत खा. पवार बोलत होते.
- सन फार्मावर मोठ संकट! FDA चा तपास आणि शेअर बाजारात मोठी हालचाल… गुंतवणूकदारांनी काय करावं?
- श्रीगोंदा तालुक्यात कांद्याच्या भावात वाढ, चांगल्या प्रतिच्या कांद्याला मिळतोय प्रतिक्विंटल एवढे रूपये बाजारभाव
- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ राष्ट्रीय महामार्गावर तयार होणार सहापदरी उड्डाणपुल, कसा असणार नवा प्रकल्प?
- जुलै महिन्यात महाराष्ट्रात सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन! राज्यातील ‘ह्या’ 18 रेल्वे स्थानकावर थांबणार
- अहिल्यानगर महापालिकेला दोन महिन्यात नागरिकांनी भरला तब्बल २२ कोटींचा कर, महापालिकेच्या सूट योजनेला मोठा प्रतिसाद