अहमदनगर : नगर तालुक्यातील बहुतांशी पाणी योजना शिवसेनेने आणल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांनी खोटे बोलून दिशाभूल करुन श्रेय लाटू नये. शिवसैनिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत.
मागील ५ वर्षात सत्तेच्या विरोधातील आमदार निवडून दिल्याने तालुक्याची पिछेहाट झाली. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याने मागील ५ वर्षे जनतेने शिक्षा भोगली आहे.

असे टीकास्त्र शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. गाडे सर यांनी विरोधकांवर सोडले. लोकसभेप्रमाणे आघाडीचे विधानसभा निवडणुकीतही निश्चितपणे पानिपत होईल, नगर शहरासह जिल्ह्यातील बाराही जागा महायुती मोठ्या फरकाने जिंकेल असा दावा त्यांनी केला.
नगर तालुक्यात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शिवसैनिकांनी कुठल्याही अमिषांना बळी पडू नये. ही निवडणूक ही पाचपुतेंची नसून शिवसैनिकांची आहे. नगर-श्रीगोंदा मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिक हा शेवटपर्यंत प्रामाणिकपणे लढणार आहे.असेही प्रा.गाडे म्हणाले.
मागील वेळेस भाजप, शिवसेना वेगवेगळला लढल्यामुळे पाचपुते यांना मत विभागणीचा फटका बसला. विशेष म्हणजे टँकर, छावण्या,रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात केली. नगर तालुक्यासाठी कोट्यवधीचा निधी आनला.
यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे देखील बबनरावांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. त्यामुळे सर्व शिवसैनिक पाचपुते यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन प्रा.गाडे यांनी केले.
- दत्तक मुलाला दत्तक पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- अर्थसंकल्प २०२६ मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा? पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता
- नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाला गती; नाशिकच्या दळणवळण विकासाला नवे वळण
- सोयाबीनच्या भावात जोरदार तेजी; ६ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता
- मुंबईकरांना दिलासा! २०२६ मध्ये पाच मोठे पूल व उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार













