अहमदनगर :- हे शहर माझे आणि आणि मी या शहराचा एक घटक आहे,असे मानले तरच आपण शहरचा चेहरा मोहरा बदलू शकतो. शहराचा विकास साधायचा असेल तर सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने नुकतीच महनगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिक्रण विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, रिजवान शेख, अर्जुन जाधव, सुरेश मिसाळ, राहूल तनपुरे, शंकरराव औटी, दादा जाधव, साहेबराव गायकवाड, मच्छिंद्र कोर्हाळे, नसाळे, शिंदे, मोरे, पटेकर, बडेमिया आदीसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार जगताप यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार जगताप म्हणाले, शहरातील रस्ते रुंदीकरण, युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी एमआयडसी येथे छोटे उद्योग, व्यापारपेठेत नवीन उद्योगांना चालना मिळण्यासाठी रुंदीकरण हा प्रश्न हाती घेणार आहे.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













