मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १५ दिवस उलटले असतानाही महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण का देत नाहीत? असा थेट प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना तूर्त काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण असं आहे.

- अहिल्यानगर जिल्ह्यातील ४७ हजार ब्रास वाळूसाठी चौथ्यांदा लिलाव प्रकिया, मात्र प्रशासनाकडे एकही निवीदा प्राप्त नाही
- पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळले तर ठाण्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा इशारा
- सोशल मीडियावर ‘असे’ फोटो शेअर केल्याने होऊ शकते नजर दोष, काय उपाय कराल?
- ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात दोन चेहऱ्यांचे, बोलण्यात पटाईत पण विश्वास ठेवताना सावध राहा! जाणून घ्या त्यांचा खरा स्वभाव
- नागीणचे लक्षणे दिसताच तातडीने ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर त्रास!