उत्तर प्रदेश :- हरदोईच्या सरकारी रुग्णालयातील परिचारिकेने ६-६ बोटे असलेल्या नवजात अर्भकाचे एक-एक बोट कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मृत बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून परिचारिकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरदोईतील बाढ करेंखा गावातील लक्ष्मी नामक महिलेला शनिवारी रात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे तिला तातडीने बिलग्राममधील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी)मध्ये दाखल करण्यात आले.

रविवारी सकाळी लक्ष्मीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या हाताला पाचऐवजी सहा-सहा बोटे होती; परंतु रुग्णालयातील परिचारिका विद्यादेवीने बाळाचे एक-एक बोट कापून टाकल्याचा आरोप लक्ष्मीचे पती रवींद्र यांनी लावला. बोट कापल्याने बाळाची प्रकृती खालावली; परंतु रुग्णालयाने त्याकडे कानाडोळा करत आई व बाळाला रुग्णालयातून सुट्टी दिली.
- नववी-दहावीला किमान २० विद्यार्थी बंधनकारक; २०२५-२६ साठी संचमान्यता अंतिम, दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता
- सीएसटीएम पुनर्विकासाचा फटका; विदर्भ-मुंबई प्रवाशांसाठी पुढील तीन महिने बदले रेल्वे वेळापत्रक
- हे 5 वैयक्तिक वित्त नियम पाळा; पैशांचे नियोजन सुधरेल आणि बचतही वाढेल
- केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत? सामान्य माणसाला मिळणार मोठा दिलासा
- उन्हाळ्यात गारवा देणारी महाराष्ट्रातील ५ थंड हवेची ठिकाणे; सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन्स













