अहमदनगर :- अवकाळी पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना डोळ्यासमोर शेती पिके उद्ध्वस्त होताना बघावी लागत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. त्यांचे अश्रूपुसण्यासाठी पुढाऱ्यांचे निव्वळ दौरेच सुरू आहेत.
प्रशासन पंचनामे करीत आहे. याद्वारे शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील हजारो एकर सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, डाळिंबासह फळबागा या पावसाने अडचणीत आल्या.

महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून पडणारा पाऊस, शेतात साचलेले पाणी, खराब झालेली पिके यामुळे नगर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात शेती उद्ध्वस्त झाली आहे. व्यापारी व बाजारपेठाही अडचणीत आल्या आहेत. काही विक्रेत्यांनी ‘उधारी बंद’ असे फलक लावले आहेत.
राष्ट्रीयीकृत बँका व पतसंस्था यांच्याकडून कर्ज वितरण बंद आहे. अवकाळी पावसाने सगळीच स्वप्ने चक्काचूर झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कधी कमी तर कधी जास्त पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.
कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या या शेतकऱ्यांना सरकारने वीज बिल माफ, उतारा कोरा आणि भरीव स्वरुपात मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी भरपाईचे निकष बदलून जाचक अटी दूर करण्याची गरज आहे.
- Amazon Prime Day सेलमध्ये स्मार्टटीव्ही खरेदी करा ‘हाफ प्राइस’ मध्ये; लिस्टमध्ये Sony ते Samsung अशी मोठी नावे!
- लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेत की नाही ? कसे चेक करणार? पहा…
- OnePlus चा 5500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरावाला फोन झाला स्वस्त, धमाका ऑफर फक्त 8 जुलैपर्यंतच!
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाचा ५०% बफर स्टॉक सरकारने केला खुला, युवानेते विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
- अहिल्यानगर जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन स्थगित! रुग्णवाहिका चालकांच्या मागण्यांवर होणार चर्चा