जामखेड :- तीन वेगवेगळ्या घटनांत बालिका, शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
पहिली घटना भुतवडा येथे घडली. शनिवार आदिती हनुमंत मोरे (१२ वर्षे) ही मुलगी आईबरोबर शेतात गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने तिला शेजारी असलेल्या भुतवडा तलावात पाणी आणण्यासाठी पाठवले. ती आपल्या लहान भावंडांना घेऊन पाणी आणण्यासाठी गेली.

आदिती तलावात पाणी काढण्यासाठी उतरली असता तोल जाऊन पाण्यात पडून बुडायला लागली. काठावर उभ्या असलेल्या भावंडांनी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी आदितीला तलावातून बाहेर काढले, मात्र तिचा मृत्यू झाला.
दुसरी घटना शेतकरी बाबासाहेब भिमराव डोके (४५ वर्षे) यांनी घरात कोणी नसताना समोर असलेल्या सिमेंटच्या कॉलमला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिसऱ्या घटनेत शनिवारी रात्री शहरातील बसस्थानकात घडली. पुणे – बीड (एमएच ०६, बीडब्ल्यू ०९४०) या शिवशाही बसचा चालक गाडी पाठीमागे घेत असताना मागील चाकाखाली एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













