दिल्लीत आगामी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने आम आदमी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मोफत मेट्रो, मोफत वीजनंतर आता केजरीवाल सरकार ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यावर विचार करत आहे.
‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केली जात असून लवकरच ती सरकारकडे पाठवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत अरविंद केजरीवाल यांचे सरकार शेतकऱ्यांची विशेष काळजी घेत त्यांच्या पिकांच्या किमतीपेक्षा ५० टक्के अधिक देण्याची तयारी करत आहे.

ही योजना लागू झाल्यानंतर दिल्लीतील शेतकऱ्यांच्या गव्हाची किंमत प्रति क्विटंल २५०० रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. . या योजनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आम आदमी पक्ष (आप)चे सरकार या महिन्याच्या अखेरीस ही योजना लागू करण्याच्या विचाराधीन आहे.
याबाबतच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत जवळपास २० हजार शेतकरी कुटंब राहतात. या योजनेतून अनेक कुुटंबांना फायदा होणार आहे.
- महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावातून धावणार Railway ; कसा असणार रूट ? पहा….
- Samsung चा Middle Class लोकांसाठी स्पेशल स्मार्टफोन ! आता ६ वर्ष टेन्शन नाही…
- Ola सोबत थेट स्पर्धा देणारी Simple One 2025 स्कूटर स्पीड आणि पॉवरमध्ये आघाडीवर !
- iQOO Z10 Turbo Pro : 7500mAh बॅटरी, Snapdragon 8s Elite प्रोसेसर, 144Hz डिस्प्लेसह ह्या दिवशी होणार लॉन्च
- भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV Blackstorm Edition आता मिळणार फक्त 7…..