पुणे : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी यामुळे उस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
दरम्यान, पावसामुळे आलेल्या पुराचा फटका सर्वाधिक उसपीकाला बसला असून राज्यात सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील उस पीक वाया गेले आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षात पावसाने दडी मारल्याने उसाची लागवड म्हणावी अशी झाली नाही.

अद्यापही मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, सोलापूर तसेच लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाउस झालेला नाही. शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. जूनपूर्वी गाळपासाठी राज्यात साडेसहा लाख हेक्टर उस उपलब्ध होता.
मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील सागंली , सातारा, कोल्हापूर या उसपट्ट्यात आलेला पूर आणि मराठवाड्यातील दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी गाळपाचा हंगाम एक महिना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
- Share Market Crash : शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, निफ्टीने २९ वर्षांचा विक्रम मोडला!
- Vivo T4x 5G : 6500mAh बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह बजेटमध्ये येणार ! किंमत आणि फीचर्स पहाच…
- Best SUV Cars India : तुमच्या बजेटमध्ये बेस्ट SUV कोणती? ८ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या ४ सर्वोत्तम कार्स
- Kia PV5 Electric Van लाँच, एकदा चार्ज केल्यावर जाईल पुणे ते मुंबई दोनदा ….
- Best Diesel Cars : ह्या आहेत भारतातील सर्वात स्वस्त डिझेल कार्स किंमत सुरु होते फक्त सात लाखांत…