राहुरी: म्हैसगाव , शेरी चिखलठाण येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली. यावेळी ‘ पिकांच्या नुकसानीसह, वाहून गेलेल्या शेतीचे स्वतंत्र पंचनामे करावेत’ , अशी सूचना त्यांनी तहसीलदारांना केली.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मोबाईलवर संपर्क साधून , नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी . रस्त्यांच्या कामासाठीही निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

ओढे – नाल्यांतील पाण्यातून वाट काढत , उंच – सखल जमिनीवरील चिखल तुडवत , दोन किलोमीटर पायी चालून तनपुरे यांनी फुटलेले बंधारे पाहिले . वाहून गेलेली शेती व ऊसपिके , मुळासकट उपटलेल्या डाळिंबबागा खराब झालेले रस्ते , असे विदारक चित्र पाहून तनपुरे हळहळले.
रस्ते व बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले .
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या ड्रोनच्या साह्याने कुरणदरा ओढ्याच्या दुतर्फा शेतजमिनींच्या नुकसानीचे चित्रीकरण करण्यात आले .
दरम्यान, पिकांच्या नुकसानीसाठी जिरायती क्षेत्राला रुपये ६८०० , तर बागायत क्षेत्राला १८ हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाईल . वाहून गेलेल्या शेतजमिनीसाठी ३७ हजार ५०० व मातीचा भर जमा झालेल्या शेतजमिनीसाठी १३ हजार ५०० रुपये मदत दिली जाईल, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले.
- अहिल्यानगर जिल्ह्याने कृषीच्या ई-ऑफिस प्रणालीत राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
- अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तूरा, जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
- संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा वाद पोहचला मंत्रालयात, मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीतून तोडगा निघणार
- जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लावलेल्या १००टक्केच्या फलकावरून संपूर्ण तालुक्यात तणाव !
- उपमुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर श्रीगोंद्यातील आंदोलन स्थगित: बारा दिवस सुरू होते भजन कीर्तन आंदोलन