राहुरी :- तालुक्यातील टाकळीमियाॅ पंचक्रोशीत सातशे हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असताना शिवारफेरी करण्याऐवजी खासदार सदाशिव लोखंडे, तसेच महसूल व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत बैठक बोलावून निव्वळ देखावा केल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रवि मोरे यांनी केली.
परतीच्या पावसामुळे टाकळीमियाॅ व देवळाली मंडलामधील ३२ गावांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी खासदार लोखंडे, तहसीलदार फैसुद्दिन शेख, तालुका कृषी अधिकारी ठोकळ यांनी चांदेगाव, लाख, त्रिंबकपूर, मालुंजे भागात पाहणी दौरा आयोजित केला होता.

टाकळीमियाॅ भागात मोठे नुकसान झाल्याने खासदार लोखंडे, तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी शिवारफेरी करण्याची गरज होती. तथापि, या जबाबदार घटकांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.
टाकळीमियाॅ ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. खासदार लोखंडे म्हणाले, पावसाने नुकसान झालेल्या कपाशी, सोयाबीन, मका या पिकांचे पंचनामे होणार असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दरम्यान, २०१६ मध्ये राहुरी तालुक्यातील ९० टक्के पिकांचे नुकसान झाले होते.
या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरलेला असताना बाजरी वगळता इतर पिकांना विमा कंपनीकडून कुठलीही भरपाई मिळाली नाही. शासन म्हणून खासदार व महसूल, कृषी अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने विमा कंपनीवर कारवाई करून भरपाई मिळण्याबाबत आपण काय केले, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित करताच खासदार लोखंडे, तसेच तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी निरुत्तर झाले.
- 1000 किलोमीटरचा प्रवास आता फक्त आठ तासात! वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत लोकसभेतून समोर आली मोठी अपडेट
- राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर ! कर्जमाफीसाठीची प्रक्रिया झाली सुरु, फडणवीस सरकारकडून राज्यातील बँकांना महत्त्वाचे आदेश
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी! ‘ही’ आयटी कंपनी गुंतवणूकदारांना देणार 5 बोनस शेअर्स
- राज्यातील शिक्षकांसाठी महायुती सरकार मोठा निर्णय घेणार ! बदल्यांसाठीच्या GR बाबत ‘हा’ निर्णय घेतला जाणार?
- दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता Board Exam साठी ‘हा’ आयडी द्यावा लागणार













