नेवासा – चांगल्या पावसाच्या भरवशावर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप पेरण्या पाटपाणी वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाया गेल्या.त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गडाख यांनी म्हटले आहे, की चांगल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, कपाशी आदी खरीप पिकांची पेरणी केली. मुळा व भंडारदरा ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पाटपाणी मिळून पिके जगण्याची आशा होती.

त्याचवेळी तालुक्यात पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांच्या मागणीवरून दोन्हीही धरणांतून एक महिन्यापूर्वी आवर्तन सोडण्यात आले. यातून श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील साठवण बंधारे व तलाव भरून शेतीलाही मुबलक पाणी देण्यात आले; मात्र या दोन्ही धरणांच्या आवर्तनातून नेवासा तालुका अद्यापही वंचित आहे.
त्यामुळे पिके जळून गेली आहेत. ‘टेल टू हेड’ हा नियम अत्यंत तकलादू आणि नेवासा तालुक्याची क्रूर चेष्टा करणारा ठरला आहे. ‘मुळा’ व ‘भंडारदरा’च्या आवर्तनांना वेगवेगळा न्याय दिला जात आहे. आवर्तन काळात मुळा धरण्याच्या हेडला असलेल्या राहुरी तालुक्यातील बंधारे, तलाव भरून शेतीलाही पाणी देण्याचा प्रकार होत आहे.
शेतकऱ्याच्या कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यांना आधार देण्याची जबाबदारी शासनाची असून पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
- शनिची दृष्टी केव्हा चांगली? शनिदेवाच्या दृष्टी किती? वाचा, न्यायदेवतेबाबत सर्व काही
- काय सांगताय..? LPG गॅस, AC च काय पण कमोडचाही होतो स्फोट; कशामुळे? उपाय काय? वाचा
- प्राॅपर्टी खरेदी करताना ही एक गोष्ट केली तर वाचतील लाखो रुपये, प्राॅपर्टी खरेदी करण्यापूर्वी हे वाचाच
- एलोन मस्क झाला 15 व्या आणि 16 व्या मुलांचा बाप? ‘त्या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म
- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 1449 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असणार रूट ?