श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज, आर्वी, पेडगाव परिसरात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळूउपसा होत असल्याचे दिसताच येथील तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने एकूण ८ बोटी जिलेटीनने उडवून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल बुधवारी नष्ट केला.
अजनुज, आर्वी व पेडगाव या नदीकाठच्या गावांत नदीपात्रातून विनापरवाना राजरोस वाळूउपसा होत असल्याचे माहिती तहसीलदार माळी यांना समजताच महसूलचे पथक पोलिस कर्मचाऱ्यांसह नदीपात्रात गेले. आठ बोटींच्या साह्याने वाळूउपसा सुरू असल्याचे त्यांना दिसले.

महसूलचे पथक दिसताच वाळूउपसा करणारे पळून गेले. या पथकाने तस्करांच्या ८ बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उडवून दिल्या. सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
कारवाईसाठी गेलेल्या पथकात पेडगावचे मंडल अधिकारी अजबे, प्रशांत सोनवणे, सतीश घोडेकर, दादा टाके, उत्तम राऊत, प्रताप देवकाते, किरण बोराडे यांचा समावेश होता.
- ब्रेकिंग : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, आरबीआयची महाराष्ट्रातील ‘या’ तीन बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून जारी झाली नवीन गाईडलाईन ! कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची की तोट्याची?
- आनंदाची बातमी ! सोयाबीनची 8,000 रुपयांकडे वाटचाल, इथं मिळाला विक्रमी भाव, यंदा पिवळं सोन 10,000 टप्पा गाठणार ?
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी !
- 10 हजार रुपयांची गुंतवणूक आणि दरमहा 40 हजार रुपयांची कमाई ! ‘हे’ 2 बिजनेस बनवणार मालामाल