आपल्यापैकी अनेक जण थट्टा मस्करी मध्ये पैज लावत असतात, ‘ मी पैंज लावू शकतो’ ‘लाव शर्त’ अशा गोष्टी चालू असतात. काहीतर याला सूत्र शब्द म्हणून वापरतात. परंतू या पैंजा कधी कधी खूप महागात पडतात. जौनपुर मध्ये असच या पैजेचा एकजण शिकार शिकार झाला यात त्याला आपला जीव गमवावा लागला.
# काय आहे नक्की प्रकरण?

जौनपुर मध्ये एक बिबिगंज नावाचा बाजार आहे. स्थानिक वृत्तपत्रांच्या अहवालानुसार, कला धौरहरा गावात राहणाऱ्या सुभाष यांचा स्वतःचा व्यवसाय आहे.१ नोव्हेबर या दिवशी सुभाष आपल्या मित्रांसोबत अंडे खायला गेले.
तिथे थट्टा मस्करी मध्ये कोणीतरी सहजच बोलून गेले’ कोण कीती अंडे खाऊ शकतो?’ हसता हसता पैंज पण लागली.
पैंज अशी होती की जर कोणी ५० अंडे खाऊन १ बाटली दारू प्यायला तर तो जिंकला. हीच पैंज जिंकण्यासाठी सुभाष पुढे आला. त्यांना पाहण्यासाठी बाजारात गर्दीही जमा होऊ लागली होती.
सुभाष यांनी अंडे खायला सुरुवात केली. प्रत्येक अंड खाताना लोग त्यांना प्रो्साहित करत होते,४० अंडे खाऊन झाल्यावर लोकांनी त्यांच्या साठी टाळ्या वाजवल्या.४१ अंडे तर सुभाष यांनी खाल्ले. जसं त्यांनी ४२व अंड खाल्ल, ते तिथेच जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडले. लोक सुभाष यांना जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेले.तिथे रात्री उशिरा पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.
# याच वर्षी केलं दुसर लग्न
सांगितलं जात की, सुभाष यांनी याच वर्षी दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या पत्नी पासून चार मुली होत्या. सुभाष यांनी दुसर लग्न जवळपास ९ महिन्यांपर्वी केलं होतं. त्यांची पत्नी गर्भवती होती. परंतु आता सुभाष राहिले नाही. आसपास लोक या घटनेची चर्चा करतात. काही लोक यात सुभाष याची चूक सांगतात , काहीजण त्यांच्या मित्रांची चूक सांगतात, कि त्यांनी हे सगळ थांबवणं गरजेचं होतं. मुद्दा काहीही असो परंतू यात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला.
- पूर्व जन्माचे कर्मफळ घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! जन्मतारखांनुसार ओळखा कसे असेल तुमचे भविष्य?
- 508 किमी प्रवास अवघ्या 3 तासांत! देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?, रेल्वेमंत्र्यांनी दिली सर्व अपडेट
- महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला 27 जुलैपासून एक अतिरिक्त थांबा मंजूर ! वेळापत्रकात झाला मोठा बदल
- फक्त मांसाहारी नाही, शाकाहारी अन्नातूनही मिळते 20 ग्रॅमपर्यंत प्रोटीन! पाहा ‘प्रोटीन बूस्ट’ देणारे 5 सुपरफूड्स
- अहिल्यानगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘बेंगलोर’ मार्केटने घातली भुरळ, कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटला शेतकऱ्यांची पसंती