अहमदनगर : येथील मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. च्या माध्यमातून गुंतवणुक करणाऱ्यांची फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ५३ लाख ४० हजाराची फसवणुक झाली असून या प्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (वय ५०, रा. वाकोडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गवळी यांच्या फिर्यादीनुसार कंपनीशी निगडीत असलेले सचिन कारभारी साळुंके व युवराज सोपान रणसिंगे या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते.

व्यवहारातूनच ज्यांनी गुंतवणुक केली त्यांची फसवणुक झाली आहे. अहमदनगर : येथील मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. च्या माध्यमातून गुंतवणुक करणाऱ्यांची फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ५३ लाख ४० हजाराची फसवणुक झाली असून या प्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (वय ५०, रा. वाकोडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गवळी यांच्या फिर्यादीनुसार कंपनीशी निगडीत असलेले सचिन कारभारी साळुंके व युवराज सोपान रणसिंगे या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते.
व्यवहारातूनच ज्यांनी गुंतवणुक केली त्यांची फसवणुक झाली आहे. याबाबत फिर्यादीनुसार पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. कार्यालय प्रेमदान चौकातील डौले हॉस्पिटल शेजारी होते. या कंपनीत फिर्यादी चंद्रकांत गवळी यांनी २५ लाखाची रक्कम भरली होती.
मोहन नाथा दुसुंगे (रा. नेहरू चौक, भिंगार) यांनी ५ लाख, किशोरकुमार रामपाल प्रजापती (रा. भिस्तबाग चौक) यांनी ८ लाख ९० हजार रुपये, अनिल श्रीमल पितळे (रा. नवी पेठ) यांनी ७ लाख रुपये, रामचंद्र दशरथ बोडवे (रा. भिंगार) यांनी ७ लाख ५० हजार रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून भरले होते. मात्र संबंधित कंपनीने गुंतवणुक करणाऱ्यांना व्याजास्वरूपात कुठलाही मोबदला न देता तब्बल ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणुक केली.
- पावसाळ्यात सर्दी, ताप आणि आजारांपासून स्वतःचा बचाव करायचाय? मग रोज सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ पेय नक्की प्या!
- जगात सर्वात जास्त चांदी कोणत्या देशात? भारताचा क्रमांक पाहून आश्चर्यचकित व्हाल!
- मुंबई, दिल्ली, हैदराबाद…भारतीय चव जगभर पोहोचली, ‘या’ 6 शहरांनी आंतरराष्ट्रीय खाद्य यादीत मारली बाजी!
- श्रावण महिन्यात भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद हवाय?, मग धारण करा 5 मुखी रुद्राक्ष! जाणून घ्या रुद्राक्ष घालण्याचे नियम आणि पद्धत
- पाकिस्तान तर फक्त बाहुला, भारतासाठी खरा शत्रू ठरतोय शेजारी देश; ‘या’ प्रमुख पातळ्यांवर भारताला वाढला धोका!