अहमदनगर : येथील मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. च्या माध्यमातून गुंतवणुक करणाऱ्यांची फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ५३ लाख ४० हजाराची फसवणुक झाली असून या प्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (वय ५०, रा. वाकोडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गवळी यांच्या फिर्यादीनुसार कंपनीशी निगडीत असलेले सचिन कारभारी साळुंके व युवराज सोपान रणसिंगे या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते.

व्यवहारातूनच ज्यांनी गुंतवणुक केली त्यांची फसवणुक झाली आहे. अहमदनगर : येथील मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. च्या माध्यमातून गुंतवणुक करणाऱ्यांची फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ५३ लाख ४० हजाराची फसवणुक झाली असून या प्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (वय ५०, रा. वाकोडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गवळी यांच्या फिर्यादीनुसार कंपनीशी निगडीत असलेले सचिन कारभारी साळुंके व युवराज सोपान रणसिंगे या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कंपनीत भिशी पद्धतीने व्यवहार केले जात होते.
व्यवहारातूनच ज्यांनी गुंतवणुक केली त्यांची फसवणुक झाली आहे. याबाबत फिर्यादीनुसार पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मॅक्सस्क्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. कार्यालय प्रेमदान चौकातील डौले हॉस्पिटल शेजारी होते. या कंपनीत फिर्यादी चंद्रकांत गवळी यांनी २५ लाखाची रक्कम भरली होती.
मोहन नाथा दुसुंगे (रा. नेहरू चौक, भिंगार) यांनी ५ लाख, किशोरकुमार रामपाल प्रजापती (रा. भिस्तबाग चौक) यांनी ८ लाख ९० हजार रुपये, अनिल श्रीमल पितळे (रा. नवी पेठ) यांनी ७ लाख रुपये, रामचंद्र दशरथ बोडवे (रा. भिंगार) यांनी ७ लाख ५० हजार रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून भरले होते. मात्र संबंधित कंपनीने गुंतवणुक करणाऱ्यांना व्याजास्वरूपात कुठलाही मोबदला न देता तब्बल ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणुक केली.
- अहिल्यानगर जिल्ह्याने कृषीच्या ई-ऑफिस प्रणालीत राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
- अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तूरा, जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
- संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराचा वाद पोहचला मंत्रालयात, मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीतून तोडगा निघणार
- जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लावलेल्या १००टक्केच्या फलकावरून संपूर्ण तालुक्यात तणाव !
- उपमुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर श्रीगोंद्यातील आंदोलन स्थगित: बारा दिवस सुरू होते भजन कीर्तन आंदोलन