नवी दिल्ली : भारताच्या डोक्यावर तब्बल ८८ लाख कोटी रुपयांचे डोंगराएवढे कर्ज आहे. तरीही सर्वकाही चांगले कसे आहे? असा परिस्थितिसापेक्ष सवाल काँग्रेसने शनिवारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना, भारतात सर्वकाही अलबेल असल्याचा दावा केला होता.
त्यावर आर्थिक आकडेवारीचा हवाला देत काँग्रेसने तोंडसूख घेतले आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सरकारवर टीकेचा भडिमार केला. त्या म्हणाल्या की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचे कर्ज ८८ लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

मागील तिमाहीच्या तुलनेत हे कर्ज ४ टक्क्यांनी वाढले आहे. निश्चितपणे हा चिंतेचा विषय आहे; परंतु अशा विदारक स्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार कॉर्पोरेट विश्वाला सवलत देत आहे, असा आरोप श्रीनेत यांनी केला
देशात सर्वकाही अलबेल आहे, असा दावा नरेंद्र मोदी परदेशातून करीत आहेत; परंतु भारताच्या डोक्यावरील कर्जाचा भार पाहता देशात सर्वकाही चांगले आहे, असे कसे म्हणता येईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकेकाळी फ्रान्सच्या महाराणीने भाकरीऐवजी केक खा, असा अजब सल्ला दिला होता.
सद्यस्थिती पाहता भारताची वाटचालसुद्धा महाराणीच्या वृत्तीप्रमाणेच होत असल्याचा टोला श्रीनेत यांनी लगावला आहे. दरम्यान, केंद्र सरकारला कदाचित वस्तुस्थिती ज्ञात नाही. सामान्य जनतेच्या खिशात दमडी नाही. अशात कॉर्पोरेट कर कपात केला जात आहे.
यातून कार्पोरेट जगत स्वत:चे वहिखाते दुरुस्त करील; परंतु गुंतवणुकीसाठी ते अजिबात धजावणार नाहीत, असा प्रहार त्यांनी केला आहे. सरकारच्या चुकीच्या भूमिके मुळे कर्जाची दरी वाढणार आहे.
- सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
- महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी ! 35 हजार शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार कापला जाणार, खरं कारण उघड ?
- अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी Good News! तिरुपतीसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी, वाचा सविस्तर
- प्रतीक्षा संपली….! शेवटी आठव्या वेतन आयोगाबाबत तो मोठा खुलासा झालाच, वाचा डिटेल्स
- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 17 Railway Station वर थांबा मंजूर













