दिल्ली : आरोग्यास हानिकारक आहे की नाही याबाबत वाद असलेल्या ई-सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार देशात ई-सिगारेटचे उत्पादन व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवरी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच धूम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे वेड वाढल्याचे त्यांनी सांगितले.

ई-सिगारेटपेक्षा सिगारेट अधिक घातक असून, त्यावर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्न माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.
त्यावर ई-सिगारेटचे अद्याप व्यसन लागले नसून, त्यावर सरकारने आधीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. तसेच ई-हुक्क्यावरही सरकारने बंदी घातल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्यादा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- शनी, मंगळ, शुक्र ग्रहाच्या बदलत्या चालेमुळे घडणार चमत्कार; श्रावण महिन्यात 4 राशींवर पडणार पैशांचा पाऊस!
- भारताच्या शुभांशू शुक्लाने अंतराळातून टिपला पृथ्वीचा अद्भुत नजारा, पाहा फोटो!
- पावसाळ्यात चेहरा चिकट पडतोय, पिंपल्सनेही त्रास दिलाय? जाणून घ्या बेस्ट स्किनकेअर टिप्स!
- मित्रांच्या बहीणींवरच जडलं प्रेम…, ‘या’ 5 क्रिकेटपटूंनी टीममेटच्या बहीणींशीच थाटला संसार! वाचा त्यांच्या भन्नाट लव्ह स्टोरीज
- शेतकऱ्यांनो PM किसानचे ₹2000 रुपये पाहिजे असतील, तर आत्ताच ‘ही’ कामे करून घ्या! अन्यथा खात्यात 20 वा हप्ता जमा होणार नाही