श्रीगोंदा : काँग्रेसने विखे कुटुंबाला मंत्रिपदे दिली, विरोधी पक्षनेतेपद दिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. खासदारकीचे तिकीटही तुमच्या मुलालाच पाहिजे.
त्याचा बालहट्ट पुरवला नाही म्हणून तुम्ही काँग्रेसला धोका देऊन भाजपमध्ये गेला, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील मेळाव्यात केली.

लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, आघाडीचे तिकीट मिळणार नाही याचा अंदाज आल्यावर विखेंनी भाजपत प्रवेश केला. जो आई-वडिलांचे ऐकत नाही, तो आपले काय ऐकणार. म्हणून उत्तरेचे पार्सल परत पाठवा.
या वेळी आमदार संग्राम जगताप, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी भाषण केले. या वेळी करण ससाणे, ऋषिकेश भोईटे, अनुराधा नागवडे, मनोहर पोटे, ज्ञानदेव वाफारे, दादासाहेब मुंडे यांचीही भाषणे झाली.
आमदार राहुल जगताप, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेवक सीमा गोरे, अर्चना गोरे, मधुकर शेलार, सुनील भोस या वेळी उपस्थित होते.
- ई-केवायसीतील चुका ठरल्या अडथळा; नाशिक जिल्ह्यातील १.७३ लाख ‘लाडक्या बहिणी’चा जानेवारी हप्ता होल्डवर
- शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी नवीन कृषी कायदे; बनावट बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा
- १ फेब्रुवारी २०२६ पासून आर्थिक बदल; घरगुती बजेटवर होणार थेट परिणाम
- आठव्या वेतन आयोगावरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा; 12 फेब्रुवारीला देशव्यापी एकदिवसीय संपाची शक्यता
- Volkswagen India ची 2026 साठी मोठी तयारी; 5 नवीन कार्स लाँच होणार, Tayron R-Line ठरणार सर्वात खास SUV













