श्रीगोंदा : काँग्रेसने विखे कुटुंबाला मंत्रिपदे दिली, विरोधी पक्षनेतेपद दिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. खासदारकीचे तिकीटही तुमच्या मुलालाच पाहिजे.
त्याचा बालहट्ट पुरवला नाही म्हणून तुम्ही काँग्रेसला धोका देऊन भाजपमध्ये गेला, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील मेळाव्यात केली.

लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, आघाडीचे तिकीट मिळणार नाही याचा अंदाज आल्यावर विखेंनी भाजपत प्रवेश केला. जो आई-वडिलांचे ऐकत नाही, तो आपले काय ऐकणार. म्हणून उत्तरेचे पार्सल परत पाठवा.
या वेळी आमदार संग्राम जगताप, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी भाषण केले. या वेळी करण ससाणे, ऋषिकेश भोईटे, अनुराधा नागवडे, मनोहर पोटे, ज्ञानदेव वाफारे, दादासाहेब मुंडे यांचीही भाषणे झाली.
आमदार राहुल जगताप, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेवक सीमा गोरे, अर्चना गोरे, मधुकर शेलार, सुनील भोस या वेळी उपस्थित होते.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही