पारनेर :- तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.
आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. गुणोरे, ता. पारनेर) ही मयतांची नावे आहेत.
यातील एक मुलगा दिव्यांग असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. बडे कुटुंबीयांच्या मृत्यू मागे नेमके काय कारण आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रात्री नेहमीप्रमाणे बडे कुटुंबीय जेवण करून झोपले होते. आज सकाळी शेजारी राहणाऱ्यांनी पाहणी केली असता कुटुंबातील चौघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
- ब्रेकिंग : MPSC भरती प्रक्रियेत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बदल ! एमपीएससी परीक्षेमध्ये ‘या’ उमेदवारांना आता नो एन्ट्री
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! EPFO पेन्शनच्याबाबत लवकरच ‘हा’ निर्णय घेणार
- बँकेच्या वेळापत्रकात मोठा बदल ! पुढील 4 दिवस देशातील ‘या’ बँका बंद राहणार, RBI ने दिली मोठी माहिती
- ‘या’ महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारचा ग्रीन सिग्नल ! 4,200 कोटी रुपयांचा नवा एक्सप्रेस वे ‘हे’ 2 Expressway जोडणार
- Ahilyanagar Politics: अहिल्यानगरमधील भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस! जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा