अहमदनगर :- बोल्हेगाव हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या भागाला विकासकामातून शहरीकरणाचे रूप देण्याचे काम केले. निवडणूका या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात.
माझ्या गेल्या साडे चार वर्षांत शहरात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर आहे. ज्यांनी विकासकामे केली नाहीत, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासकामासाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रभागाचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव गावठाण येथील भैरवनाथ मंदिर परिसरात उद्यान निर्मितीच्या व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना जगताप बोलत होते.
जगताप म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे घेऊन गेलो आहे. चैतन्य हॉटेल ते गांधीनगर पर्यंतच्या मूळ रस्त्याचे काम मार्गी लावले.
सावेडी गाव ते बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लावले. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली व लोकवस्ती वाढली.
विकासाचा अजेंडा हाच माझा ध्यास आहे. नगर शहरात आता विकास कामावर चर्चा सुरू झाली आहे. गेली पाच वर्षे राज्य शासनाकडे विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला व निधी प्राप्त झाला. सर्वांना बरोबर घेऊन विकासाची गुढी उभी करायची आहे.
- IDBI Bank Jobs 2025: IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; 676 जागांसाठी भरती सुरू!
- सातवा वेतन आयोग : ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ! वित्त विभागाचा जीआर निघाला, किती वाढला DA ? पहा…
- महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा
- Vivo X Fold 5: टेक बाजारात विवोचा जलवा! महाकाय 6000mAh बॅटरीसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत फक्त…
- सिमेंट कंपनीनं खोटी आश्वासनं देऊन जमीन खरेदी केली, निमगाव खलू येथील शेतकऱ्यांचा आरोप