अहमदनगर :- बोल्हेगाव हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या भागाला विकासकामातून शहरीकरणाचे रूप देण्याचे काम केले. निवडणूका या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात.
माझ्या गेल्या साडे चार वर्षांत शहरात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर आहे. ज्यांनी विकासकामे केली नाहीत, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासकामासाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रभागाचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव गावठाण येथील भैरवनाथ मंदिर परिसरात उद्यान निर्मितीच्या व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना जगताप बोलत होते.
जगताप म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे घेऊन गेलो आहे. चैतन्य हॉटेल ते गांधीनगर पर्यंतच्या मूळ रस्त्याचे काम मार्गी लावले.
सावेडी गाव ते बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लावले. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली व लोकवस्ती वाढली.
विकासाचा अजेंडा हाच माझा ध्यास आहे. नगर शहरात आता विकास कामावर चर्चा सुरू झाली आहे. गेली पाच वर्षे राज्य शासनाकडे विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला व निधी प्राप्त झाला. सर्वांना बरोबर घेऊन विकासाची गुढी उभी करायची आहे.
- नाशिक, अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! मनमाड – पुणे रेल्वे प्रवास होणार वेगवान, ‘हा’ महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार गेमचेंजर
- मान्सून 2026 बाबत समोर आला मोठा अंदाज ! महाराष्ट्रात दुष्काळ पडणार का ? पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो
- निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय! पुणे म्हाडा मंडळाच्या 4186 घरांच्या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला, कधी निघणार लकी ड्रॉ ?
- राज्य शासनाचा सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय ; आता नागरिकांना त्यांच्या जवळील दवाखान्यातच मिळणार मोफत उपचार !
- 3,000 रुपये दर महिन्याला गुंतवले तर 15 वर्षांत किती रक्कम मिळेल? क्लिक करा आणि जाणून घ्या!