राहुरी :- तालुक्यातील राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बियरबार हॉटेलातील प्राणघातक हल्ल्यात गंभिर जखमी झालेले मॅनेजर नरेद्र सदानंद शेटे यांचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिस ठाण्यात आरोपींवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा वाढीव गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान गुन्हेचे गांभिर्य ओळखुन पोलिस निरिक्षक हनुमंतराव गाढे यांनी तत्काळ ३०७, ३२६ चा गुन्हा दाखल केला होता. तर नुकतेच फीर्यादी शेटे हे उपचार दरम्यान मृत्यु झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
यातील तिघा आरोपींना पोलिसांनी मागेच अटक केली आहे. घटनेची पाश्र्वभूमी अशी की, दि. ३० मे २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान राहुरी रेल्वे स्टेशन येथिल हॉटेल अक्षय बियर बार येथे तुमच्या मालकाच्या मुलाने आमच्या माणसाला मारहाण केली होती असे म्हणत
वादाच्या कारणातून हॉटेल मॅनेजर नरेद्र शेटे वय वर्ष५५ यांना आरोपी दिपक भिमराज नवले, वय वर्ष ३३, लक्ष्मण आण्णासाहेब म्हसे, वय वर्ष ३३, अशोक वसंत म्हसे, तिघे रा. कोदवड, भीमराज श्रीधर बोरकर, वय वर्ष ३८, रा. केंदळ
या टोळक्यांनी हॉटेलात घुसून लाठ्या – काठ्या दांडक्याने बेदम मारहाण करत हॉटेलातील सामानाची मोडतोड केली होती. याबाबत राहुरी पोलिसात जखमी शेटे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- प्रतीक्षा संपली ! मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला धावणार Bullet Train
- ब्रेकिंग ! केंद्र पाठोपाठ ‘या’ राज्यात स्थापित झाला आठवा वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान ! तयार होणार १३१ Km लांबीचा नवा रेल्वेमार्ग, या गावांमधून जाणार नवा मार्ग
- ……तर राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही ! नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारचा दणका
- ब्रेकिंग ! नव्या वर्षात मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, महाराष्ट्रात किती दिवस राहणार पावसाचे सावट?