कर्जत : तालुक्यात सुतगिरणी उभारण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सुतगिरणीच्या माध्यमातून सुमारे १५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील कुळधरण गणातील रुईगव्हाण येथे झालेल्या बैठकीत ना. शिंदे बोलत होते. ना. शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात केेलेल्या विकास कामांचा आढावाच सादर केला. ना. शिंदे यांनी विरोधकांवर चौफेर टिका केली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-आघाडीच्या सरकारनेच शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने वाटोळे केले. आघाडीच्या कारकिर्दीत मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भरीव कामे झाली.
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने भाजपानेच न्याय दिला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने सक्षम नेतृत्व मिळाले आहे. जम्मू काश्मिर मधील 370 कलम हटवून भाजप सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला.
देशाला नरेंद्र मोदी व राज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाची खरी गरज आहे. लोकसभेत ज्या प्रमाणे आघाडीचा धुव्वा उडाला त्याच प्रमाणे विधानसभेतही आघाडीचे पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम दावा त्यांनी केला.
कर्जत-जामखेडचे विरोधी संभाव्य उमेदवार रोहित पवार यांच्यावरही त्यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. निवडणुक काळातच ते मतदार संघात फिरता आहेत. निवडणूक संपली की ते मतदार संघातून गायब होतील अशी टिका त्यांनी केली.
- त्रिमूर्तीचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांचे निधन
- महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा ! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार ! जून महिन्यात मिळणार अधिकचा पगार
- आकाशातही तयार होऊ शकतात बर्फाचे ढग ?शास्त्रज्ञांनी उलगडलं अद्भुत रहस्य
- ‘या’ पक्षाचा आवाज ऐकूनच थरथरतात लोक, घराच्या छतावर दिसल्यास मानलं जातं अशुभ! काय आहे यामागील कारण?