जामखेड : महाजनादेश यात्रेत सोमवारी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत जामखेडकरांना दिलासा दिला. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द आहे.
समुद्रात वाहून जाणारे सुमारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या योजनेच्या माध्यमातून नाशिक, नगर व मराठवाड्यास मोठा फायदा होणार आहे.

जलसंधारणमंत्री म्हणून पंकजा मुंडे व राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगले काम केल्याचे फडणवीस म्हणाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, काँग्रेसने ध्रुवीकरणाचे, तर राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले.
गेल्या ७० वर्षांत जी कामे प्रलंबित होती, ती करताना समाजातील सर्व घटकांना भाजपने बरोबर घेतले. मराठा आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावतानाच धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करून न्याय देण्याची भूमिका घेतली. पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा घेतला.
कुकडी प्रकल्पाचे पाणी जामखेड तालुक्याला देण्याची मागणी त्यांनी केली. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा धरणात कुकडीचे पाणी नियमित सोडण्यात यावे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढच्या सरकारमधील पहिला मंत्री मी आताच निवडला आहे. राम शिंदे यांना पुन्हा एकदा मंत्री करणार आहे. जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढंच मोठं खातं त्यांना मिळेल.
- ‘हे’ 4 शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का ? मग तुम्हाला मिळणार 45 टक्क्यांपर्यंत रिटर्न
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना आजपासून खुला होणाऱ्या आयपीओमधून कमाईची सुवर्णसंधी ! 23 रुपयांचा शेअर थेट 35 रुपयांवर जाण्याची शक्यता
- सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ! सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ‘इतकी’ वाढ करणार, काय सांगतो नवा रिपोर्ट
- शासकीय सेवेतून रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! वित्त विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय
- PF कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता BHIM UPI द्वारे एका क्लिकवर खात्यात पैसे जमा होणार, कशी असणार प्रोसेस?













