राहुरी: आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा व ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला आपला पाठिंबा होता. राज्यातील पुन्हा भाजप आघाडीचे सरकार येणार आहे.
मात्र, आम्हाला सोबत घेऊन, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कंेद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देवळाली प्रवरा येथे आरपीआय मेळाव्यात केले. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात रिपाइंकडून निवडणूक अनेक लढण्यास इच्छुक आहेत.

मात्र, सुरेंद्र थोरात यांचे वडील स्वर्गीय बबनराव थोरात पहिल्यापासून आमच्याबरोबर राहिले आहे. सुरेंद्रदेखील आज जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करीत आहेत, असेही आठवले यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी रिपाइंचे सचिव श्रीकांत भालेराव होते.
यावेळी म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, रिपाइंचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामदास आठवले, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, राजाभाऊ अहिरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे काकासाहेब खंबाळकर, दीपक गायकवाड, श्रावण वाघमारे, श्याम गोसावी, जिल्हाप्रमुख सुनील साळवे आदी उपस्थित होते.
- …अन्यथा जातेगाव- नगर- शिरूर महामार्गावरील टोलनाका बंद करा, मनसेचे रविश रासकर यांचा प्रशासनाला इशारा
- पाथर्डी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्या अन साडी चोळी भेट देऊन आम आदमी पार्टीचे आंदोलन
- कर्जतचे ग्रामदैवत सदगुरू गोदड महाराजांची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी, उपायोजनांसाठी घेण्यात आली आढावा बैठक
- अहिल्यानगर जिल्ह्यात ८० टक्के खरिपाच्या पेरण्या, मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात, दुबार पेरणीची आली वेळ?
- श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या आरोपींना न्यायालयाने सुनावली ५ दिवसांची पोलिस कोठडी