कर्जत : राज्यात सर्वात विकसित मतदारसंघ म्हणून कर्जत-जामखेडची वेगळी ओळख निर्माण होईल. या भागातील प्रश्न सोडवायचे आहेत. शिक्षण, रोजगारा बरोबरच सर्वात जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न पुढील काळात कायमचा सोडवला जाईल.
असे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. दूरगाव (ता.कर्जत)येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुबारक शेख हे होते. प्रास्ताविकात दूरगावचे मा. सरपंच अशोक जायभाय म्हणाले की, गावागावात लावण्यात आलेल्या विकासाच्या बोर्डावर चुकीचा विकास दाखवण्यात आला आहे.

यावेळी ओंकार निंबाळकर, कांतिलाल लोंढे, डॉ.चंद्रकांत जायभाय, माधुरी लोंढे, नानासाहेब निकत आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. गेली पंधरा वर्षात विकासाची कामे झाली नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही अशा अनेक अडचणींचा पाढा येथील महिला ग्रामस्थांनी पवार यांच्यासमोर वाचला.
या मेळाव्यासाठी सुनिल शेलार, शहाजी निंबाळकर, राहुल नेटके, भारत मोघल, दादा परदेशी, जाकीर सय्यद, दत्ता पोटरे, सुभाष भगत, अजिनाथ जायभाय, सदाशिव निंबाळकर, सुरेश वाबळे, अमोल राजेभोसले, कैलास जायभाय, विजय क्षीरसागर, विष्णू परदेशी, दिपक शिंदे, मोहन गोडसे आदीसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या
- NMDC Steel Limited Jobs 2025: स्टील कंपनीत कंत्राटी कर्मचारी पदाची मोठी भरती सुरू! 1,80,000 पर्यंत पगार मिळणार
- सातवा वेतन आयोग अंतिम टप्प्यात सरकारी कर्मचाऱ्यांना देणार दणका ! ‘या’ कारणामुळे पगाराचा आकडा कमी होण्याची शक्यता
- पुढील 4-5 वर्षात मुंबई मोठ्या प्रमाणात बदलणार ! राजधानी मुंबईसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला ‘हा’ खास प्लॅन
- Pune News : पीएमपीमध्ये होणार मोठे बदल ! अजित पवारांनी सांगितला मोठा प्लॅन….
- मोठी बातमी ! भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या शहरातून धावणार ? कसा असणार रूट ? वाचा….