धक्कादायक : जिल्ह्यात अवघ्या तीन दिवसांत कोरोनाने ४९ जणांचे बळी घेतले.

Published on -

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत कोरोनाने ४९ जणांचे बळी घेतले. शुक्रवारी १९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ३४९ झाली.

शुक्रवारी दिवसभरात ८६७ नवे रुग्ण आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या २४ हजार २०३ झाली आहे. सर्वाधिक ३३७ रुग्ण नगर शहरात आढळून आले.

जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही काहीसे वाढले आहे. गेल्या चोवीस तासांत १९ जणांचा बळी कोरोनाने घेतला. बुधवारी सहा जणांचे बळी गेले होते. गुरुवारी २४ जणांचा बळी कोरोनाने घेतला होता.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe