श्रीगोंदे :-सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत शेडगाव, (ता. श्रीगोंदे) येथील मंगल दादाभाऊ केदारी या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी त्रास देण्यास सुरुवात केली. ही व्यथा ऐकून घेण्यास कोणी तयार नसल्याने या त्रासाला कंटाळून उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे केदारी यांनी सांगितले.

लग्नानंतर सासरे भास्कर केदारी, दीर दत्ता केदारी, मार्तंड केदारी व जाव स्वाती केदारी यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. पती दादाभाऊ केदारी यांनी बांधलेल्या घरात आम्ही निवास करत होतो. मात्र, घरावर वरील चौघांनी कब्जा करून ताब्यात घेतल्याने आम्हाला निवारा राहिलेला नाही.
या प्रकरणाची तक्रार श्रीगोंदा पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. मात्र, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे मंगल केदारी यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, छळ करणाऱ्या या व्यक्तींकडून आम्हा पती-पत्नीच्या जीवितास धोका असून, पोलिस संरक्षण मिळावे व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- जमीन, प्लॉटच्या खरेदी-विक्री बाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल ! व्यवहाराला बसण्याआधी न्यायालयाचा निकाल समजून घ्या
- LIC Policy: एलआयसीची ‘ही’ पॉलिसी घ्या आणि हॉस्पिटलच्या बिलची चिंता सोडा! बघा ए टू झेड माहिती
- सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! आता टाटा कंपनीचे ‘हे’ बॅटरी इन्व्हर्टर मिळणार फक्त 1100 रुपयात, 3 दिवसांचा बॅकअप
- GST Rate: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ट्रॅक्टर खरेदीवर करता येईल 63 हजार रुपयापर्यंत बचत…कसे ते वाचा?
- Ladki Bahin yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी वितरीत…. कधी येतील खात्यात पैसे?