श्रीरामपूर ;- क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी टाकळीभान येथे घडली.
यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती.
शांताबाई अरुण धोत्रे (वय ३०, अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) ही महिला कुटुंबासमवेत टाकळीभान येथे विहीर खोदाईच्या कामासाठी आली होती.
शनिवारी दुपारी टेलटॅँक परिसरातील एका विहिरीचे काम सुरू असताना क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडली. माल्डी शांताबाईंच्या अंगावर पडल्याने त्या जागीच ठार झाल्या.
- शनैश्वर देवस्थान घोटाळ्याची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करण्याची मागणी
- सोन्याच्या किमतीत 2 जुलै रोजी मोठा बदल ! 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार ?
- अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेशास वेग! दोन दिवसांत २९५८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
- आनंदाची बातमी : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ‘या’ भत्यात मोठी वाढ ! वाचा सविस्तर
- अहिल्यानगरमध्ये १०८ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी मांडला ठिय्या