श्रीरामपूर ;- क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी टाकळीभान येथे घडली.
यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती.
शांताबाई अरुण धोत्रे (वय ३०, अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) ही महिला कुटुंबासमवेत टाकळीभान येथे विहीर खोदाईच्या कामासाठी आली होती.
शनिवारी दुपारी टेलटॅँक परिसरातील एका विहिरीचे काम सुरू असताना क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडली. माल्डी शांताबाईंच्या अंगावर पडल्याने त्या जागीच ठार झाल्या.
- PM नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा रेकॉर्ड! भारताचे दुसरे सर्वाधिक काळचे पंतप्रधान, पहिल्या नंबरवर कोण?
- गाडीची स्पीड वाढली म्हणून चक्क 1.32 कोटींचा दंड, ‘या’ देशात ट्रॅफिक नियम मोडल्यास पगारानुसार ठरतो दंड!
- ना अरिजीत, ना जुबिन…’Saiyara’ गाण्याने तरुणाईला वेड लावणारा हा नवा काश्मिरी गायक कोण?, यूट्यूबवर होतोय ट्रेंड!
- तुम्हीही थेट गॅसवर पोळ्या भाजून खाताय?, या सवयीने वाढतो कॅन्सरचा धोका! आरोग्य तज्ज्ञांचा गंभीर इशारा
- श्रावणातील प्रत्येक शनिवारी करा ‘ही’ खास पूजा, शनिदेवाचा कोप शांत होऊन बरसेल कृपादृष्टी!