श्रीरामपूर ;- क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी टाकळीभान येथे घडली.
यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती.
शांताबाई अरुण धोत्रे (वय ३०, अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) ही महिला कुटुंबासमवेत टाकळीभान येथे विहीर खोदाईच्या कामासाठी आली होती.
शनिवारी दुपारी टेलटॅँक परिसरातील एका विहिरीचे काम सुरू असताना क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडली. माल्डी शांताबाईंच्या अंगावर पडल्याने त्या जागीच ठार झाल्या.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













