श्रीगोंदे : श्रीगोंदे तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येळपणे येथे गुरुवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बकुळाबाई तान्हाजी गिरे यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नगर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेडमध्ये अवकाळी पाऊस झाला.
अवकाळी पावसाने जनावरांच्या छावण्यांतील शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान, कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी शंकर पाटोळे याचा वीज पडून मृत्यू झाला.

श्रीगोंदे तालुक्याच्या पश्चिम भागातील येळपणे येथील पिसोरे बुद्रुकमधील बकुळाबाई तान्हाजी गिरे या शेळ्या चरण्यासाठी वीर मळ्यात गेल्या होत्या.
पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यामुळे बकुळाबाई झाडाच्या आडोशाला थांबल्या. पण त्याच क्षणी त्याच झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी
- Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग