नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे.
पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे.

खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यामुळे सुजय विखे यांना सुरेंद्र गांधीची अडचण होणार अशी चर्चा रंगत असतानाच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक खा गांधींची भेट घेऊन धक्काच दिला. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले.
दरम्यान खा गांधी यांनी आपण पक्षाशी एक निष्ठ असल्याचे सांगितले. पण त्या नंतर सुरेंद्र गांधीनी आपण आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगितले होते.
खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी आज (दि.४) सुवेंद्र गांधी यांनी निवडक कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बैठक घेऊन ही घोषणा केली. यावेळी संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासह नगर शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाने खा.दिलीप गांधी यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खा.गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी करणार नसून, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराचे काम सर्वांना करायचे आहे.
- चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चिंताजनक ! चांदीच्या किमतीत 60 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता, वाचा सविस्तर…
- खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! केंद्रातील सरकारचा नोकरदारांसाठी मोठा निर्णय, ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार १५,००० रुपये
- जानेवारी महिन्याच्या ‘या’ तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांसह खाजगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार! राज्य शासनाचा निर्णय
- सरकार शेतकऱ्यांना देणार नवीन वर्षाची मोठी भेट ! पीएम किसानच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर
- LPG गॅसची सबसिडी आता कायमची बंद होणार ? केंद्रातील सरकार मोठा निर्णय घेणार ! वाचा savis
- 1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 22 हजार रुपयांचे व्याज ! सरकारी बँकेची एफडी योजना ठरणार गुंतवणूकदारांसाठी फायद्याची
- काय सांगता! फक्त 60 मिनिटात पुण्याहून गोव्याला आणि गोव्यातून पुण्याला याल, ‘ही’ आहे जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन