अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली.

त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी धुतडोकार दाजी, विनायक चोथवे, संतोष मुतडक व प्रा. बादशहा नारायण ताजणे यासह अन्य आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी मृत शेतकऱ्याजवळल मिळालेल्या चिठ्ठीतील मजकूराबाबत मृताचे नातेवाईकांना अंधारात ठेवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
या घटनेला आता पाच दिवस उलटल्यावर मृताच्या भावजय व नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला.
त्यांनी या घटनेतील मृत शेतकरी आरोटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे पोलिसांना दिली.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी इतक्या वेळा वाढणार महागाई भत्ता, वाचा….
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कंपनीने दिली पुन्हा एकदा कमाईची मोठी संधी, वाचा सविस्तर
- महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळाला 280 KM लांबीचा नवा रेल्वे मार्ग ! कसा आहे प्रकल्प?
- पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी ! आता दररोज संध्याकाळी 7 वाजेनंतर पेट्रोल पंप बंद होणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?
- हवामानात अचानक झाला मोठा बदल….! ऐन हिवाळ्यात राज्यात गारपीटीची शक्यता, हवामान तज्ञाच्या अंदाजाने खळबळ













