अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली.

त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी धुतडोकार दाजी, विनायक चोथवे, संतोष मुतडक व प्रा. बादशहा नारायण ताजणे यासह अन्य आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी मृत शेतकऱ्याजवळल मिळालेल्या चिठ्ठीतील मजकूराबाबत मृताचे नातेवाईकांना अंधारात ठेवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
या घटनेला आता पाच दिवस उलटल्यावर मृताच्या भावजय व नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला.
त्यांनी या घटनेतील मृत शेतकरी आरोटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे पोलिसांना दिली.
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले लंडन, न्यूयॉर्क सारखे विमानतळ ! उद्घाटनाची तारीख आली समोर
- कोणताही प्रवास करण्यापूर्वी ‘हा’ एक मंत्र नक्की म्हणा, संकट तुमच्यापासून कोसो दूर राहील!
- बँक ऑफ बडोदाच्या 400 दिवसाच्या एफडी योजनेत 4,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- वाइनपासून बिअरपर्यंत…दारू काचेच्या ग्लासमध्येच का दिली जाते?, फक्त स्टाईल नव्हे तर यामागे आहे वैज्ञानिक गुपित!
- शिक्षकांचे संसद दर्शन; लोकशाहीचा थेट अनुभव खासदार नीलेश लंके यांची अभिनव संकल्पना