कृषी विद्यापीठाच्या वॉचमनचा मृत्यू; नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- राहुरी कृषी विद्यापीठातील वॉचमनचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान चंद्रकांत याच्या मृत्यूला फक्त विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या दहा वर्षांपासून सतत व एकाच जागेवर रात्रपाळीची ड्युटी लागत असल्याने चंद्रकांत देवराम पवार (वय 38 वर्षे, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी) हा तरूण तणावग्रस्त जीवन जगत होता.

सातत्याने रात्रपाळीची ड्यूटी लागत असल्याने चंद्रकांतची पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे चंद्रकांतचा संसार मोडला होता.

अशी माहिती चंद्रकांतच्या नातेवाईकांनी दिली. दि. 1 फेब्रुवारी रोजी चंद्रकांत पवार हा नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेला. 2 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान चंद्रकांत पवार हा मृतावस्थेत आढळून आला.

यावेळी त्याच्यासोबत ड्युटीवर असलेला सहकारी रामाजी शिंदे याने चंद्रकांतच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाईकांनी चंद्रकांतला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.

मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. दरम्यान चंद्रकांत याच्या मृत्यूला फक्त विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांतच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेबाबत विद्यापीठाचे कुलसचिव यांनी चौकशी करून चंद्रकांतला न्याय द्यावा. तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. अशी मागणी रोहित पाटोळे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News