अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा मुतदेह एका विहीरीत तरंगताना आढळून आला.
ही मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात मुलीच्या आजोबांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान तिचा खून झाला की आत्महत्या आहे याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत. काहीजण ही कोपर्डीची पुनरावृत्ती असल्याची चर्चा करीत आहेत.ही घटना उघडकीस आल्यापासून तशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. पीडित मुलीच्या मृत्यूबाबत शंका उपस्थिती केली जात आहे. कोपर्डी घटनेची पनरावृत्ती झाली काय? अशी शंका अनेकांना आली आहे.
मुक्ता अरणगाव येथे बारावीत शिकत होती. तिचे मूळ गाव रत्नापूर असून ती आपल्या डोणगाव येथील मामाच्या गावी आजी-आजोबांकडे लहानपणापासून रहात होती.
ती अतिशय शांत स्वभावाची होती. तिचा मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. तिची हत्या का आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews