बनावट लग्नप्रकरणी महिलेस अटक

Published on -

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :-  संगनमत करून लग्न लावल्याचे भासवून व्यापा‍ऱ्याची दागिन्यांसह ३ लाख ४८ हजारांची फसवणूक प्रकरणातील महिलेला पोलिसांनी अटक केली. तिला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

१९ जानेवारीला केशव गोविंद बनात हे लग्न लावले गेले. नवरी नांदायला येईना म्हणून सुमित कैलास पांडे यांनी नवरी व आरोपींशी संपर्क साधला. फसवणूक पांडे यांनी पोलिसांत धाव घेतली.

१३ मार्चला राहुल रजपूत ऊर्फ राहुल ऊर्फ कल्याण फकिरराव राऊत, निता राहुल राऊत, (दोघे औरंगाबाद), मेघा संजय कटारिया, अश्विनी कांबळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी गंगापूर तालुक्यातून अश्विनी कांबळे हिला अटक केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe