Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ भीषण आग ! शेजारीच पेट्रोलपंप..

शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंप मागे असलेल्या सरोष कॅन्टीनमध्ये १७ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कॅन्टीनमधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या. यावेळी मेहेरबाबा केंद्रातून सुरवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अत्यंत भीषण … Read more

नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू होणार ! नगर-मनमाड महामार्गाचे नशिब बदलणार ?

Nagar- Manmad Highway : उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या तसेच शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. यापूर्वी दोन वेळा निविदा मंजूर होऊनही कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आता तिसऱ्यांदा मंजूर झालेल्या निविदेनुसार ५१५ कोटी रुपये खर्चून ७५ किमी लांबीच्या महामार्गाचे काम … Read more

रस्त्यालगत बंद अवस्थेत लावलेली वाहने महानगरपालिका जप्त करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा

अहिल्यानगर – शहरातील रस्ते व फुटपाथवर ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेत्यांनी व्यवसाय थाटले आहेत. तसेच, शहर व उपनगर परिसरात अनेक प्रमुख रस्त्यांवर, रस्त्यालगत बंद अवस्थेतील जुनी वाहने लावण्यात आली आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. शहराच्या स्वच्छतेवरही त्याचा परिणाम होत असल्याने अशी वाहने महानगरपालिका कारवाई करून जप्त करणार आहे. सर्व प्रभाग समितीच्या प्रभाग अधिकाऱ्यांना व अतिक्रमण … Read more

वैभव नायकोडी खून प्रकरणातील मोठी अपडेट ! पोलिसांनी केली आणखी एका आरोपीला अटक

अहिल्यानगरमध्ये बहुचर्चित असलेल्या केकताई जंगल खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल बंडू पाटोळे (वय १९, रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी) याला रविवारी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तो गेल्या पंधरा दिवसांपासून फरार होता आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तोफखाना पोलिसांनी मोठ्या नियोजनानंतर त्याला ताब्यात घेतले आहे. वैभव शिवाजी नायकोडी (रा. ढवणवस्ती, नगर) याचा खून करण्यात … Read more

व्हिडीओमध्ये कैद झाला केडगावचा बिबट्या ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा

१७ मार्च २०२५ रोजी केडगावातील बायपास चौकाच्या जवळील कांबळे वस्ती येथे शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. सलीम रंगरेज यांच्या शेतात हा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने पावले उचलून रविवारी सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला. बिबट्याच्या अस्तित्वाची खात्री करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी … Read more

अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीचा स्फोट! बोल्हेगाव, नागापूर आणि एमआयडीसीत टोळ्यांचा उदय!

अहिल्यानगरच्या उत्तरेकडील उपनगरांचा वेगाने विस्तार होत आहे. लोकसंख्या वाढत असतानाच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः एमआयडीसी, बोल्हेगाव आणि नागापूर या भागांमध्ये घरफोड्या, चोरी, हाणामाऱ्या आणि टोळीयुद्धाच्या घटना सर्रास घडत आहेत. मागील काही महिन्यांत खून, अपहरण, खुनाचा प्रयत्न, आणि सार्वजनिक ठिकाणी धिंड काढण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. एमआयडीसी परिसरात विशेषतः आर्थिक आणि जमिनीच्या … Read more

‘तू माझी बायको आहेस’ म्हणत मुलीचा विनयभंग ! इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

१७ मार्च २०२५ अहिल्यानगर : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याचा तसेच तिचे फोटो असलेले व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण असून, सोशल मीडियाच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपी अविनाश गोरख ठोकळ (रा. … Read more

धक्कादायक! सराफाच्या मुलाला अमानुष मारहाण, गुंडांनी व्हिडीओही केला शूट

तिसगाव शहरालगत असलेल्या वनदेव परिसरात एका सुवर्णकार व्यावसायिकाच्या मुलाला सहा ते सात जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण करून आरोपींनी आपल्या दहशतीचा पुरावा ठेवला. शुक्रवारी (१४ मार्च) ही घटना घडली असून, या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पाथर्डी-तिसगाव रोडवरील एका हॉटेलसमोर जखमी तरुणाचा दुसऱ्या एका तरुणासोबत वाद झाला. काही वेळाने त्या … Read more

शिर्डी विमानतळाजवळ बिबट्याचा थरार, विद्यार्थ्यावर भीषण हल्ला !

Shirdi News : शिर्डी विमानतळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. या परिसरात मादी बिबट्याने दोन ते तीन पिल्लांना जन्म दिला असून, त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून हा भाग निवडला आहे. वाढती झाडे-झुडपे आणि संरक्षक भिंतीच्या उंचीची मर्यादा यामुळे बिबटे या भागात मुक्त संचार करत आहेत. विद्यार्थ्यावर बिबट्याचा हल्ला प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा … Read more

अहिल्यानगर हादरलं ! घटस्फोटासाठी १० लाखांची मागणी; तरुणाच्या आत्महत्येने खळबळ

आश्वी (ता. संगमनेर) येथे एका तरुणाने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “घटस्फोट हवा असेल, तर दहा लाख रुपये दे; अन्यथा जीव घेऊ,” अशा धमक्या पत्नी आणि सासरच्या मंडळींनी दिल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. विजय जोशी (वय २८, रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. … Read more

पाथर्डी तालुक्यात सिंचन विहिरीत घोटाळा : विभागीय आयुक्तांनी चौकशीसाठी केली तब्बल २५ अधिकाऱ्यांची नियुक्ती

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील व्यक्तिगत लाभाच्या रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी पाच जिल्हा परिषद गटांसाठी पंचवीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी केली आहे. सोमवारी (दि.१७) मार्चपासून ही पथके प्रत्यक्ष विहिरीवर जाऊन तपासणी करणार आहेत. पथकांनी रोजचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना द्यायचा आहे. यामुळे विंधन विहिरीच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ … Read more

विवाहित महिला खेळणी घ्यायला गेली अन् गायबच झाली! ‘लव जिहाद’च्या चर्चेने पेटलं गाव…

नगर जिल्ह्यातील देहरे (ता. नगर) येथे ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली होती. शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मुलासाठी जत्रेमधून खेळणी घेण्यासाठी बाहेर पडलेली ही महिला परत न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लव जिहादच्या चर्चेमुळे वातावरण तणावग्रस्त महिलेच्या … Read more

Mauli Gavane Murder Case : माऊलीच्या खुनाच खरं कारण आलं समोर ! समलैंगिक संबंध …

Mauli Gavane Murder Case : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे १२ मार्च रोजी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. विठ्ठल मांडगे यांच्या शेतातील विहिरीत पोत्यात भरलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय धडापासून वेगळे करण्यात आल्याचे समोर आले. ही हत्या अत्यंत निर्दयपणे करण्यात आल्याने … Read more

ढिसाळ नियोजनामुळे मुळाच्या आवर्तनाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच नाही : ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी

अहिल्यानगर : मुळा कालव्यातून शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे कोलमडले आहे. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव, सामनगाव व मळेगावच्या टेलच्या भागातील शेतकऱ्यांचे भरणे बाकी असताना वरच्या भागातील मायनर उघडून टेलचे पाणी बंद करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली असताना पैसे भरूनही हेडच्या पाटबंधारे अधिकारी व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांची पाण्यासाठी … Read more

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा! उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर : पहा कांद्याला किती मिळतोय भाव

अहिल्यानगर : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा नगदी पीक असलेल्या कांदा पीक घेण्याकडे कल आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु गेल्या आठ दिवसांत कांदा दरात घसरण सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून कांदा … Read more

मोटारसायकलस्वराने हूल दिल्याने ‘त्या’अवघड घाटात ट्रकचा अपघात

अहिल्यानगर : बऱ्याचदा अन्य वाहनाने हूल दिल्याने मोटारसायकलचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र काल याच्या अगदी उलट घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्वच वाहनचालकांचा कस लागणाऱ्या करंजी घाटामध्ये रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटल्याने दोन जण जखमी झाले. सदर मालट्रक नगरकडून पाथर्डीकडे जात होता. हा ट्रक माणिकपीर बाबा दर्ग्याजवळ एका धोकादायक वळणाजवळ आला … Read more

खा. पवार यांची अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घोषणा : आता ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील घेणार ‘एआय’चे धडे !

अहिल्यानगर : सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरातील विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत निर्माण होत आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञानाबाबत काहीसे मागे आहेत. मात्र आता ही दरी देखील दूर होणार आहे कारण आता लवकरच रयतच्या शाळांतून एआय’ तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येणार आहेत ,अशी माहिती देशाचे माजी केंद्रिय कृषी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे … Read more

बचत गटाच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ उमेद मॉल’ उभारणार : ना.विखे पाटील

अहिल्यानगर : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या अद्ययावत उमेद मॉलची जिल्हास्तरावर उभारणी करण्यात येईल, तसेच प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषद आणि … Read more