अहमदनगर शहरातील 23 मशिदीमध्ये एक वेळच्या आजानची परवानगी

अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉक डाउन काळात शहरातील सर्व मशिदी बंद आहेत. मात्र रमजान काळात राज्यांसाठी सवलत देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदी मध्ये उपवास सोडण्यासाठी फक्त (मगरिब) संध्याकाळची आजानला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एक वेळच्या आजानची परवानगी देण्यात आली आहे. … Read more

ब्रेकिंग : अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन,रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

अहमदनगर Live24 :- हिंदूत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे आज निधन झाले आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  अपर्णा रामतीर्थकर या चांगल्या वक्त्या होत्या आणि त्यांची मते त्या परखडपणे मांडत होत्या. पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. … Read more

रणरागिणींनी उद्ध्वस्तकेला अवैध गावठी दारूचा अड्डा !

नेवासे :- तालुक्यातील मुकिंदपूर येथे अनेक दिवसांपासून खुलेआमपणे सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा स्थानिक महिला बचत गटाच्या रणरागिनींनी एकत्र येत नेवासे पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केला. मुकिंदपूर येथील गट नंबर ७६ मधील सुरेखा चव्हाण यांच्या येथे चालू असलेला गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याने या परिसरात तळीरामांचा उपद्रव वाढला होता. तळीरामांच्या आरडाओरड तसेच अश्लील भाषेतील शिव्यांनी महिलांची … Read more

कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत वास्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 :- कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत संगमनेर येथील तीनजण सावळीविहीर येथे नातेवाईकांकडे वास्तव्य करत असल्याचे कळताच पोलिसांनी हे कुटुंब, तसेच आश्रय देणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. प्रशासनाने रेड झोन तयार करुन विनापरवाना कोणी गावाबाहेर जाऊ नये, असे सक्त आदेश दिले असताना संगमनेर शहरातून पोलिसांना चकवा देत तीन जणांनी सावळीविहीर येथील आपल्या नातेवाईकांकडे आश्रय … Read more

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘या’ शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे

अहमदनगर Live24 :- जामखेड कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी सोमवारी दिली. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे. सर्व शहर एका कंट्रोल अंतर्गत आणले असून कोणीही बाहेरचा व्यक्ती येणार नाही व शहरातील व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. आतापर्यंत १८५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाचपुते पिता-पुत्राकडून व्यवस्थापकाला मारहाण

अहमदनगर Live24 :- काष्टी सेवा संस्थेतील गैरव्यवहार व व्यापारी कमिशन साखळी उघड केल्याच्या रागातून ज्येष्ठ संचालक भगवानराव पाचपुते, त्यांचा मुलगा प्रताप यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी केली. तक्रारीत म्हटले आहे, गेल्या काही महिन्यांत संस्थेच्या कारभारात भगवानराव यांचे चिरंजीव प्रताप यांचा काहीही संबंध … Read more

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 8590 ! जाणून घ्या तुमच्या शहरासह जिल्ह्यातील माहिती

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित १७ अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा … Read more

टाळेबंदीपूर्वी खरेदी केलेल्या वनोपजावरील व्याज व शिक्षार्थ जमीन भाडे माफ

मुंबई दि. 27 : –  सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात 24 मार्च 2020 पासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काष्ठ व्यापाऱ्यांना विहित कालावधीत त्यांनी खरेदी केलेला माल (वनोपज) शासकीय आगारातून हलविणे तसेच विभागातील कर्मचाऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीमुळे आवश्यक त्या परवानग्या घेणेही शक्य होत नाही. म्हणून काष्ठ व्यापाऱ्यांनी टाळेबंदीपूर्वी (24 मार्च 2020 पूर्वी ) खरेदी केलेल्या … Read more

दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 :- राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील वाळू वाहतूक करतांना पकडलेला ट्रॅकटर सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करणारा तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. अशोक रामचंद्र थोरात असे आरोपीचे नाव असून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांचे मालकीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आरोपी लोकसेवक यांनी रविवारी पकडले होते. सदर ट्रॅक्टरवर कोणतीही … Read more

आमदार लंके यांनी का केली कुकडी डाव्या कालव्याची पाहणी ?

पारनेर :- आमदार नीलेश लंके यांनी आज कुकडी डावा कालव्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, कुकडी प्रकल्प नारायणगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी सुहास साळवे यांच्या सोबत बैठक घेऊन पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. आमदार लंके यांच्या सुचनेनुसार दि. 27 रोजी अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील जनतेकरीता पाण्याचे आवर्तन सोडले असून हे पाणी व्यवस्थीत शेतकऱ्यांना मिळते की नाही … Read more

खा.सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ मागणी

अहमदनगर :-  कोरोना पार्श्वभूमीवर महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्राला कोरोना पासून लांब ठेवत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. कोरोनाच्या लढाई मध्ये ह्या योध्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हरियाणा सारख्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला आहे. मात्र महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचारी वर्गाची पगार कपात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्वस्त धान्य दुकानावर कारवाई;चार दुकाने केली सील

अहमदनगर Live24 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून या काळात शेवगाव मधील काही स्वस्त धान्य दुकान चालक काळा बाजार करत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी शेवगावला भेट देऊन कारवाई केली. चार दुकाने सील केले. अनेक स्वस्त धान्य दुकानदार आणि त्यांना पाठीशी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार ; मुंबईवरून आलेल्या मुलास वडिलांनी ठेवले घराबाहेर !

अहमदनगर :- मुंबई येथील 57 वर्षीय एक दुचाकीवर थेट राहुरीत आला. मात्र, वडिलांनी त्यास घरात प्रवेश नाकारला. त्यांनी दोन रात्री घराबाहेर काढल्या. येथे “होम क्वारंटाईन’चा शिक्का हातावर बसला. मात्र, येथील निवारा केंद्रात थांबण्याऐवजी त्यांनी मुंबईची परतीची वाट धरली. राहुरी कारखाना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडविली. प्रशासनाला कळविले. अखेर त्यांची रवानगी नगरच्या जिल्हा रुग्णालयात झाली. … Read more

महाराष्ट्राच्या आर्थिक पॅकेजसंदर्भात  खा. शरद पवारांनी केली ही मागणी 

मुंबईः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासाठी महाराष्ट्राला आर्थिक मदत देण्याची मागणी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र सरकारने सध्याच्या संकटाच्या काळात आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी केंद्राकडे अतिरिक्त अनुदानाची विनंती केली आहे. याचा विचार होण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं … Read more

धक्कादायक : सर्व्हेत आढळले ‘सारी’चे दोन रुग्ण !

अहमदनगर Live24 :- नेवासा तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेवासा नगरपंचायत व तालुक्यातील 130 गावांची घरोघर तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सर्व्हे झाला आहे. या तपासणीत सारीचे दोन संशयित तर करोनाचा प्रादुर्भाव असल्याचे कोणीही आढळून आलेले नाही. तालुक्याची आरोग्य तपासणीची पहिली फेरी उद्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी … Read more

आमदार ऐन संकटात नागरिकांना वार्‍यावर सोडून निघून गेल्याने गोरगरीब हवालदिल

अहमदनगर Live24 :- कोणीही उपाशी राहणार नाही, अशी गर्जना करणार्‍या आमदार लहू कानडे यांचा दावा खोटा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदारांचे श्रीरामपूर संपर्क कार्यालय व निवासस्थान बंद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी केला आहे. भिसे म्हणाले की, करोनाच्या संकटाने गोरगरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार लहू कानडे यांनी दानशूर संस्था, … Read more

चुकीच्या राजकीय निर्णयामुळे श्रीरामपूरकर हवालदिल !

अहमदनगर Live24 :- करोनाच्या संकटकाळात गोरगरिबांचे हाल होत असताना श्रीरामपूर मतदारसंघाचे नेतृत्व आधार देण्याऐवजी लोकांकडून सामान गोळा करून स्वतःचे स्टिकर लावण्यात व्यस्त आहे. या मतदारसंघात झालेल्या चुकीच्या राजकीय निर्णयामुळे नागरिकांना हवालदिल होण्याची वेळ आल्याचा आरोप भाजयुमोचे सरचिटणीस अक्षय वर्पे यांनी केला आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. वर्पे म्हणाले, वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे … Read more