बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला  !

श्रीरामपूर :- तालुक्यात काल दुपारनंतर अनेक ठिकाणी बेमोसमी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. काल श्रीरामपूर शहरासह लगतच्या टिळकनगर, दत्तनगर तसेच तालुक्यातील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, सराला-गोवर्धन, निमगाव खैरी परिसरात सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ झिमझिम पाऊस झाला.  तसेच गोंडेगाव, खानापूर, माळवाडगाव, भामाठाण, मातुलठाण, पढेगाव, बेलापूर, मातापूर, भोकर, खोकर, … Read more

अवकाळी पावसाने शेतकरी व नागरीकांची उडाली धांदल

संगमनेर :- तालुक्यातील आश्वीसह परिसराला शनिवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरीकांची चागलीच धांदल उडाली.  गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. शनिवारी सकाळी थंडी वाजत होती, तर दुपारी आभाळ आल्याने हवेत उष्णता वाढली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आश्वीसह परिसराला … Read more

धक्कादायक : अहमदनगर शहरात 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार !

नगर शहरातील कल्याण रोडवरील लोंढे मळा परिसरात समोसे विक्री करणार्‍या 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर नराधमाने चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या छाती व पोटाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.जखमी अल्पवयीन मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील केडगाव देवी मंदिर रोडवर शुक्रवारी (दि. 7) रात्री 8 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भावानेच केला दगडाने ठेचुन सख्या भावाचा खून…कारण वाचून बसेल तुम्हाला धक्का !

अहमदनगर जिल्ह्यात भावानेच सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत.    बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून सख्या भावानेच नातेवाईकांच्या मदतीने भावाचा दगडाने ठेचुन व चाकू कुऱ्हाड अशा हत्यारांनी भोसकुन खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे शुक्रवारी घडली. … Read more

डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू

संगमनेर :- कोल्हार-घोटी महामार्गावरील समनापूर चौफुलीवर खड्ड्यांमुळे ॲक्टिवावर बसलेली महिला खाली पडली. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. कवठे कमळेश्वर येथे राहणाऱ्या कमल लहू राजभोज (५०) नवीन ॲक्टिवावरून नातेवाईकासमवेत संगमनेर येथे बाजारासाठी जात होत्या. कोल्हार-घोटी महामार्गावर समनापूर चौफुली येथे खड्ड्यात दुचाकी आदळून त्या खाली पडल्या. पाठीमागून … Read more

सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीगोंदे फॅक्टरी येथील सावकारांच्या जाचाला कंटाळून मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या तरुणाने बुधवारी विषप्राशन केले. त्याचा शनिवारी मृत्यू झाला.  दत्ता गणपत सुतार (वय ३५) हा तरुण शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करत होता. काही सावकारांकडून त्याने आठवड्याला १० टक्के दराने कर्ज घेतले होते. अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते फेडता येत नव्हते. सावकार दारात येऊन त्याला मारहाणीची धमकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून महिलेवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरातील तीस वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अजित बाबुराव दुधाळ (कांदा मार्केट, शेळके हॉस्पिटलजवळ, श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, आपण घरी एकटी असताना आरोपी आला. लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण; जाणून घ्या कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती, किती धोकादायक?

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. या व्हायरसविषयी सातत्याने येत असलेल्या बातम्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण … Read more

राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईपर्यंत महाराष्ट्र सोडून जाणार नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही. महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच ठाकरे सरकार विश्वासघातकी असल्याने ते टिकणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मुंबईत शनिवारी विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचा १७ वा वर्धापन दिन फडणवीस यांच्या … Read more

असा जाईल तुमचा आजचा दिवस वाचा राशीभविष्य 8 फेब्रुवारी 2020

मेष :- आज धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.  व्यवसायात यशस्वी व्हाल. प्रसारमाध्यमांच्या लोकांसाठी आजचा दिवस हा यशाचा असेल. वृषभ :-  आर्थिक व्यवहार करताना सावधान रहा. तुमची आई आज तुमच्यावर खूश होईल. भेटवस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे.पैशांचं आगमन आज निश्चित आहे.  मिथुन :- : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल !

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.नेवासा येथे राहणारा एका २५ वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाली असण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणाच्या रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर त्याला या व्हायरसची लागण झालेली आहे की नाही … Read more

शरद पवार यांच्या हत्येचा कट ? पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासह वेब पोर्टल विरोधात तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीतून आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी​नगर पोलीस … Read more

कोरोना व्हायरसमुळे चायनीज आणि चिकन ला बुरे दिन

करोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या चिकनच्या मागणीत घट झाली आहे. नागरिकांनी चिकन घेणे कमी केले आहे. या दिवसात चिकनची विक्री निम्म्याने घटली आहे. चीनसह अन्य देशांत फैलावलेल्या करोना व्हायरसची नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या भीतीपोटी चायनीज फास्ट फूडची मागणी घटली आहे.  नागरिकांकडून चायनीज फूड खाणे टाळले जात आहे. त्यामुळे चायनीज खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी कमी झाली … Read more

राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्या. – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक जिल्‍ह्यातील साकुर येथे तमाशा कलावंतांवर झालेला हल्‍ला पुरोगामी महाराष्‍ट्राच्‍या दृष्‍टीने निंदनिय असुन, या घटनेचे गांभिर्य ओळखुन राज्‍य सरकारने दोषी व्‍यक्तिं विरोधातील खटला जलदगती न्‍यायालयात चालवावा आणि राज्‍यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात मुख्‍यमंत्र्यांना आ.विखे पाटील यांनी पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, नाशिक जिल्‍ह्यातील … Read more

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या रोमिओचे नागरिकांनी केले ‘हे’ हाल !

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार शहरात आज भर दुपारी अडीच वाजता घडला आहे. या रोडरोमिओची नागरीकांनी चांगलीच धुलाई केली.  मुलीला कॉलेजला जात असताना हा रोमिओ नेहमी तिची छेड काढायचा. आजही हा रोमिओ छेड काढत होता. अल्पवयीन मुलगी रस्त्याने जात असताना तिच्या दिशेने चिठ्ठी फेकणे, इशारे करणे असे प्रकार हा रोमिओ करायचा. पाठलाग करण्यासारखे ही … Read more

पोटनिवडणुकीत फक्त शिवसेनेचा ‘पराभव’ नाही, अनिल राठोडांसह शिवसेनेने ‘हे’ गमाविले आहे !

अहमदनगर :- महापालिकेच्या पोटनिवडणूक निकालाचा दुहेरी फटका शिवसेनेला बसला आहे. निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने आपल्याकडे असलेली जागा गमवावी लागलीच व आता महापालिका स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीतील प्रतिनिधित्वही प्रत्येकी एका सदस्याने कमी झाले आहे. महापालिका स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये प्रत्येकी १६ सदस्य असतात. महापालिकेचे ६८ नगरसेवक असल्याने या सदस्य संख्येने … Read more

श्रीरामपूरमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग

श्रीरामपूर :- येथील कन्या विद्यालयात शिकणाऱ्या पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला शाळेतून घरी जाताना त्रास देणाऱ्या संदीप कांबळे (डुडे, रामनगर वॉर्ड १) या तरूणाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्रासलेल्या विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले आहे, विद्यालयातून घरी जात असताना कांबळे पंधरा दिवसांपासून त्रास देत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने आवाज दिला, पण आपण त्याच्याकडे पाहिले … Read more

या कारणामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग फसला….

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पल्लवी जाधव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनिता दळवी यांचा १ हजार ७१२ मतांनी पराभव केला. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर करण्यात आलेला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला. महापालिकेत राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप सत्तेत आहे. असे असतानाही राज्याच्या धर्तीवर नगर शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी … Read more