आमदार बबनराव पाचपुते व रोहित पवार यांची आमदारकी धोक्यात !

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि आ.रोहित पवार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावलेल्या पराभूत उमेदवारांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपविणे, … Read more

जामीनदार न झाल्याने आतेभावाचा खून करणार्या आरोपीस जन्मठेप !

अहमदनगर :- जेलमध्ये असताना जामीनदार झाला नाही.याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे, रा.वडुले बु. काळे वस्ती ता.शेवगाव.याने त्याचा आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे याचा चाकूने भोसकून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायाधीश क्र. २ श्री.अशोककुमार भिल्लारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर काळे याला जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील … Read more

का झाला माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव ? हे दोन नगरसेवक हिटलिस्टवर !

अहमदनगर :- राज्यात आणि देशात युतीचे सरकार असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अनिल राठोड यांना पराभवास सामोरे जावे लागले. तब्बल ११ हजार ११५ मतांनी आ.अनिल राठोड यांचा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पराभव केला,हा पराभव राठोड यांच्यासह शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. केवळ भाजपच नव्हे, तर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्याची चर्चा आहे.आणि … Read more

विखे पाटील पिता पुत्रांवर शिवाजी कर्डिले यांची जोरदार टीका केले हे वक्तव्य !

राहुरी :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रथमच माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत,तनपुरे साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून थेट विखे पिता – पुत्रांवरच त्यांनी आरोपांचा हल्ला केला आहे. फक्त लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याच्या राजकीय हेतूने विखे पिता-पुत्रांनी राहुरीचा डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला होता काय, असा संशय येतो, असे वक्तव्य … Read more

साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह !

औरंगाबाद: शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह असल्याची भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली आहे. व्यक्ती गायब होण्याच्या अशा प्रकारातून मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एस. एम. … Read more

धक्कादायक : बापाकडून मुलीचा गळा दाबून खून

पुणे : पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तालय हद्दीतील दापाेडी येथे एका कुटुंबातील १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून सावत्र बापाने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केला आहे का, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट हाेईल, अशी माहिती भाेसरी पाेलिसांनी दिली. विजय बबन चव्हाण (४४, रा. दापाेडी) असे आराेपीचे नाव आहे.

आमदार आशुतोष काळेंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये

कोपरगाव: माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी आपल्या कारकीर्दीत मंजूर करून आणलेल्या रस्त्यांची मंजुरी आमदार आशुतोष काळे आपणच ते मंजूर करून आणल्याचे खोटेच जनतेला सांगत आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यामुळे काळे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, अशी परखड टीका विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत निदान … Read more

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ठेकेदाराचा मा. खा. गांधी यांना पुळका का ?

पारनेर: म्हसणेफाटा येथील औद्योगिक वसाहतीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार, शेतकऱ्यांसाठी भूखंड यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी किती वेळा आवाज उठवला, असा सवाल करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ठेकेदाराचा गांधी यांना पुळका का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केला. अवैध गौण खनिज उपसाप्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हसणेफाटा येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ठेकेदारांवर केलेल्या दंडात्मक कारवाईवर … Read more

नुकसान भरपाईचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार, ४५०० कोटी रुपये मंजूर

मुंबई: ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. त्यापोटी शुक्रवारी राज्याच्या महसूल व वन विभागाने ४ हजार ५०० कोटींच्या निधीला मंजुरी दिली. अवकाळी पावसाने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २४९ तालुक्यांतील शेतपिके व बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान … Read more

विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलले !

कोपरगाव : ‘तू आम्हाला आवडत नाहीस, तू आम्हाला नको आहे, मला दुसरे लग्न करायचे आहे’, असे म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिला घराबाहेर काढून दिल्याच्या प्रकरणात पती व सासरा यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंजिरी शार्दुल देव (वय ३०, रा. श्रीराम मंदिराच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत १२ मुले ताब्यात

साकुरी : शिर्डी शहरात दि. १ डिसेंबरपासून ‘ऑपरेशन मुस्कान ७’ ही मोहीम राबविण्यात येत असून, दि. १२ डिसेंबर रोजी साईबाबा मंदिर परिसरात अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अपर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील पोलीस पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली. यात जवळपास दहा ते पंधरा या वयोगटातील … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्यास बाहेर काढण्यात यश

शिर्डी : शिर्डीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या बिरोबा बनातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास काढण्यात वनविभागास अखेर यश आले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने या भागातील रहिवाशी तसेच शेतकरी वर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या शिर्डीपासून जवळच असलेल्या बिरोबा बनातील शेतकरी संजय माधव कोते यांच्या विहिरीत पडला होता. गुरुवारी (दि. १२) सकाळी सात वाजेच्या … Read more

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 8 जणांनी बेदम मारहाण करत महिलेला ठार मारले !

श्रीगोंदा : तालुक्यातील सुरेगाव शिवारातील मनीषा दत्तात्रय भोसले वय २५ या गरोदर महिलेला दि.२४/११/१९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती बाजार करून घरी जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून तिला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तोंडात कापड कोंबून आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. यात मनीषा गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दि.९/१२/१९रोजी उपचारादरम्यांन तिचा … Read more

वाळू तस्करांना दणका तब्बल ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा : पोलिसांनी सध्या वाळूतस्करांकडे आपला मोर्चा वळवला असून, गत दोन दिवसात पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर,चार ट्रक, एक डंपर जवळपास १७ ब्रास वाळू असा एकूण ६३ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या फिर्यादीवरून चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर … Read more

अरे बापरे ! ह्या देशात वर्षभरात तिसऱ्यांदा निवडणूक !

जेरुसलेम : राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेल्या इस्त्रायलमध्ये वर्षभराच्या कालावधीत तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. स्पष्ट बहुमताअभावी कोणत्याही पक्षाला निर्धारित वेळेत सरकार स्थापन करता न आल्यामुळे २ मार्च रोजी पुन्हा निवडणूक घेण्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. सप्टेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पक्षासह कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे याठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली … Read more

अवघ्या 16 वर्षांची ही मुलगी ठरली ‘पर्सन ऑफ द इअर’

न्यूयॉर्क : हवामान बदलाच्या विरोधात लढा देणाऱ्या स्वीडनच्या १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गला अमेरिकेच्या ‘टाइम’ मासिकाने यंदाची ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित केले आहे. हा बहुमान मिळवणारी ग्रेटा ही सर्वात तरुण व्यक्ती बनली आहे. जगप्रसिद्घ ‘टाइम’कडून १९२७ पासून ‘पर्सन ऑफ द इअर’ निवडण्यात येतो. शालेय विद्यार्थिनी असलेल्या ग्रेटाने हवामान बदलाविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. … Read more

आवर्तन पाहिजे असेल तर थकीत पाणीपट्टी भरा !

कोपरगाव : गोदावरी उजव्या कालव्याला रब्बी आवर्तन सुटणार असून, आधी थकीत पाणीपट्टी भरण्याची सक्ती केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. रब्बी आवर्तन नसल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणीचा ७ नंबर फॉर्म भरून घेतले जात आहेत. मात्र, ज्यांची थकीत पाणीपट्टी असेल त्यांना पाणीपट्टी भरणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीची पसरली आहे. कोपरगाव तालुक्यातील … Read more

सावधान ! महागडी चारचाकी स्वस्तात देवून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय 

अहमदनगर :- अत्यंत कमी वापरलेली महागडी चारचाकी स्वस्तात देतो. म्हणून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय झाले आहे.या रॅकेटने अनेकांना गंडा घातला असून, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही स्वस्तातल्या गाडीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन गुन्हेगार स्वत: लष्करात सेवेत असल्याचे भासवत आहेत. संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एका युवकाला चारचाकी घ्यायची … Read more