बुडालेल्या मित्राला शोधताना मित्राचाही मृत्यू…

शेवगाव :- बंधाऱ्यात बुडालेल्या मित्राला शोधण्यासाठी तो पाण्यात उतरला, परंतु त्याचाही बुडून मृत्यू झाला. दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे वडुले बुद्रूकवर शोककळा पसरली. ही घटना नंदिनी नदीवर असलेल्या बंधाऱ्यात घडली. रजनिकांत ऊर्फ गुड्डू नंदू काते (३०) व अमृत रघुनाथ चोपडे (३८) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. रजनिकांत रविवारपासून घरातून बेपत्ता होता. सोमवारी शेवगाव-मिरी रस्त्यावरील वडुले … Read more

आई, बहिण आणि वहिनीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या मुलाची त्याच्याच वडिलांनी केली हत्या !

 वृत्तसंस्था :- नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक, भयानक घटना मध्यप्रदेश राज्यामध्ये घडली.आपल्याच आई, बहिण आणि वहिनीवर वारंवार बलात्कार करणार्या दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याच्या वडिलांनी त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय  दतिया येथे एका परिवारातील सदस्यांवर त्यांच्याच व्यसनी मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृतकाच्या वडिलांसह परिवारातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. परिवारातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना अटक

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करणार्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अपहरण प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्या दोघांची चौकशी सुरू आहे.अपहरणानंतर काही तासांतच पोलिसांनी हुंडेकरी यांची सुटका केली होती. परंतु आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते. हुंडेकरी मोटर्स … Read more

ही व्यक्ती होवू शकते आता अहमदनगर जिल्हापरिषदेची अध्यक्ष !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नव्या अध्यक्षपदाची सोडत आज मंगळवारी झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष लागले होते. आज सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्रालयात लकी ड्राॅ पध्दतीने अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढली गेली. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत : * अनुसूचित जाती … Read more

पालखी सोहळ्यात घुसला जेसीबी,नामदेव महाराजांचे वंशज जागीच ठार !

पुणे :- कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात जेसिबी (JCB) मशीन घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. जेसिबीचा ब्रेक फेल झाल्याने ते दिंडीत घुसले. दोन वारकरी चिरडून जागीच ठार झाले.मंगळवारी सकाळी 8.30 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली.  यात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36 वर्षे) यांच्यासह अतुल महाराज आळशी … Read more

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार?

अहमदनगर :- नगर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नव्या अध्यक्षपदाची सोडत मंगळवारी (१९ नोव्हेंबर) होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष लागले आहे. २००१ पासून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीसाठी एकदा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकदा, याच प्रवर्ग महिलासाठी एकदा व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी एकदा असे … Read more

तीन वर्षांत केदारेश्वर कर्जमुक्त होईल : ॲड. ढाकणे

कर्तव्याशी एकनिष्ठ रहिल्यानेच बबनराव ढाकणे यांनी राजकारणात महाराष्ट्र पादाक्रांत केला. धेयवादी रहिल्यास यश निशितपणे मिळते. समाज हा परीक्षा पाहत असतो, या परीक्षेत कुणी नापास ठरतो तर कुणाला गुण कमी मिळतात. समाजाची परीक्षा पाहण्याची प्रक्रिया अवरित सुरूच असते. त्यामुळे अभ्यासही सारखा चालूच ठेवावा लागतो, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी केले. तर … Read more

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची अशी झाली सुटका, जालन्यातून थेट बस द्वारे असे पोहोचले अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- आज पहाटे अपहरण झालेले प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी पोलिसांना जालन्यात सापडले, अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना नगरमधून पळवून जालन्यात सोडून दिलं.  उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी … Read more

विकासकामांत राजकारण करणार नाही – आ. रोहित पवार

कर्जत: तालुक्यातील गावे बूथ कमिटीव्दारे ज़ोडण्यात येतील, अशी माहिती आ. रोहित पवार यांनी दिली. कर्जत तालुक्यात गावनिहाय बूथ कगिटची स्थापना करण्याच्या उद्देशाने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ. पवार बोलत होते. तालुक्याच्या विकासाचा आराखडा मांडताना, आगामी काळात जनतेच्या हिताचीच कामे होतील. विकासकामांत राजकारण करणार नाही, कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी गावागावांत बूथ कमिटीची स्थापना करणार … Read more

..तर शेतकऱ्याच्या मुलगा करणार आत्मदहन !

कर्जत :कुकडी कालव्यासाठी संपादित केलेल्या ज़मिनीचा योग्य मोबला न मिळाल्याने कोरेगाव येथील मूकबधिर शेतकरी हणुमंत मारुती जाधव यांचा मुलगा अशोक हणुमंत जाधव यांनी सोमवार, दि.१८ रोजी कर्जत येथील उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची महिती अशी की, तालुक्यातील कोरेगाव येथील मूकबधिर शेतकरी हणुमंत मारुती जाधव यांची गटनंबर १५०३ मध्ये शेती असून, यातील १५०३/२ … Read more

 निकृष्ट दर्ज्यांच्या कामांचा आ. लंकेंनी केला पर्दाफाश 

पारनेर – सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली व सध्या सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा पर्दाफाश आमदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत केलेल्या पाहणीदरम्यान रविवारी केला.  लंके यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांची तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याच वेळी निकृष्ट कामांविषयी नाराजी व्यक्त करत या कामांची पाहणी करण्याचे जाहीर केले होते. सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियांता राऊत, … Read more

…असे घडले हुंडेकरी यांचे अपहरण थरारनाट्य ….

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांचे आज भल्या पहाटे अज्ञात चार ते पाच जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे नगरसह जिल्ह्यात खळबळ उडाली.या अपहरणाचे थरारनाट्य एखाद्या चित्रपटासारखेच होते. नगर येथील ६४ वर्षाचे हाजी करीमभाई हुंडेकरी हे मोठे उद्योजक, व्यावसायिक असून हुंडेकरी लॉन्स, टाटा शोरुम तसेच सिमेंट, हॉटेल असे … Read more

अपहरण झालेले उद्योजक करीम हुंडेकरी यांची सुखरूप सुटका !

अहमदनगर :-  आज सकाळी पिस्तूलाच्या धाकाने अपहरण झालेले शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीम हुंडेकरी यांना पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद-जालना रोडवरुन सुखरुपपणे ताब्यात घेतले असून उद्योजक हुंडेकरी यांना सव्वातीन वाजता नगरमध्ये आणण्यात आले आहे. शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले होते. या घटनेुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून … Read more

 पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडत महंतांची आत्महत्या 

प्रयागराज –  उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे निरंजनी आखाड्याचे महंत आशिष गिरी यांनी रविवारी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.  आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी, पोलिस उपमहानिरीक्षक के. पी. सिंग आणि पोलिस अधीक्षक बृजेश श्रीवास्तव यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली. आजारपणास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे धर्मगुरूंच्या वतीने सांगण्यात आले. आखाडा परिषदेचे … Read more

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार – आ. कानडे

श्रीरामपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी मला साथ दिली आणि त्याला मतदारराजानेदेखील पसंती दिली. शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून मी मतदारसंघात कामे करणार आहे.  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्य देऊ, असे श्रीरामपूरचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांनी सांगितले. आमदार कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी शनिवारपासून आपला दौरा सुरू केला. … Read more

नागवडे साखर कारखान्याच्या अजब फतव्याने सभासदांत तीर्व नाराजी 

File Photo

श्रीगोंदे –  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ महिन्यांवर येऊन ठेपली असताना कारखाना प्रशासनाने एका वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन ज्या सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत, त्यांनी डिसेंबरअखेर पूर्ण करावेत, अन्यथा मतदानास वंचित राहावे लागेल असा फतवा काढल्याने सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे.  नागवडे कारखान्याची उभारणी सुमारे ४५ वर्षांपूर्वी झाली, त्यावेळी सभासदत्व शुल्क ३ … Read more

‘या’ कारणामुळे तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा बंद !

राहुरी शहर – गेली दोन वर्षे सुरळीत चाललेला डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा उसाच्या टंचाईमुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी कमी पावसाने राहुरीतील ऊसक्षेत्र घटण्यास कारणीभूत ठरले.  तनपुरेच्या कार्यक्षेत्रात १५ लाख टन ऊस असतो, मात्र यंदाच्या गळीत हंगामात राहुरी तालुक्यात केवळ‌ २ लाख टन ऊस उपलब्ध आहे. नवीन लागवडीसाठी बेणे म्हणून त्यातील … Read more

राम मंदिराची उभारणी सरकारच्या पैशातून करू नका !

मुंबई – अयोध्येच्या श्रीराम मंदिर आंदोलनासाठी आजपर्यंत सहा कोटी भक्तांनी योगदान दिले आहे. २४ वर्षांपासून मंदिराचे दगड कोरण्याचे काम अव्याहत सुरू आहे.  त्यामुळे राम मंदिर सरकारी निधीतून नव्हे तर समाजाच्या पैशातून उभारायला हवे. हे मंदिर सरकारी हाेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी रविवारी मांडली. सायन कोळीवाडा येथील अशोक … Read more