भाजप हरयाणात यंदा पुन्हा सत्ता हस्तगत करणार !

चंदीगड : हरयाणा विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपला प्रतिद्वंद्वी काँग्रेस व जननायक जनता पक्षाने (जेजेपी) तगडे आव्हान दिले असतानाही भाजपने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर हरयाणाची सत्ता पादाक्रांत करीत जोरदार पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. राज्यात एकूण ८९ लाख तरुण मतदार आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्याच हाती सत्तेची चावी असल्याचे मानले जात आहे.  हरयाणा … Read more

‘तुम्ही कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाच्या फुलालाच मिळेल’ – भाजप उमेदवार

जिंद : भाजपच्या हरयाणातील एका उमेदवाराने रविवारी ‘विधानसभा निवडणुकीत कुणालाही मत दिले तरी ते भाजपलाच मिळणार’ असल्याचा वादग्रस्त दावा केल्यामुळे देशात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ हरयाणात चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपचे असंध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीशसिंह विर्क यांनी हा दावा केला आहे. ‘तुम्ही कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाच्या फुलालाच मिळेल.  आज … Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारुची विक्री करणाऱ्यांविरुध्द धडक कारवाई सुरु आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८० हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात अवैद्य दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन … Read more

विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

जामखेड : शेतात शेळ्या चारत असताना खाली पडलेल्या पोलच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे अशोक शिवाजी पुढाईत (वय २५ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आघी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जामखेड तालुक्यातील आघी या ठिकाणी रविवार दि.२० रोजी अशोक शिवाजी पुढाईत हा तरुण शेळ्या चारण्यासाठी घेवून गेला होता. सध्या पावसाळा असल्याने गेल्या … Read more

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे दांडीबहाद्दर अडचणीत

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन नगर शहर मतदारसंघातील तिघांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान साहित्य नेण्यासाठी दोन केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी यांनी टाळाटाळ व हलगर्जीपणा केल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.  या तिघांच्या सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तत्काळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगर शहर मतदारसंघाचे सहायक … Read more

नगरमध्ये ५४ लाखांचे सोने-चांदी व भेटवस्तू जप्त

नगर –विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने रविवारी सोने, चांदी व महागड्या भेटवस्तू असा सुमारे ५४ लाखांचा मुद्देमाल पकडला. वसंत टेकडी भागात वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पद वाहनात (एमएच ०२ डीजे ७१७७) दोन बॉक्स आढळले. एका बॉक्समध्ये ५१ लाख ७२ हजार ८३९ रुपये किमतीचे सुमारे दीड किलो सोने आणि दुसऱ्या बॉक्समधे ३ लाख १५ … Read more

निळवंडेचे पाणी मिळेल त्या दिवशी आमदारकी सार्थकी

कोपरगाव : या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धसास लावण्यासाठी विरोधकांनी कितीही आडकाठी निर्माण केली, तरी न डगमगता त्याचा खंबीरपणे मुकाबला करणारच. विरोधकांनी निळवंडे पाणी योजनेत खोडा घातला; परंतु ज्या दिवशी कोेपरगावकरांना निळवंडेचे पाणी प्यायला मिळेल, तो दिवस आपली आमदारकी सार्थकी लागण्याचा असेल, असे भावोद्गार महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा

हाजीपूर : बिहारच्या नागरिकांविषयी अवमानास्पद विधान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात येथील एका न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘बिहारचे नागरिक ५०० रुपयांचे तिकीट काढून रेल्वेने दिल्लीला येतात व ५ लाख रुपयांचा मोफत उपचार करवून परत बिहारला निघून जातात,’ असे वादग्रस्त विधान अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच … Read more

नेता सुभाष चौक जुगाराचा अड्डा !

अहमदनगर : पाच वर्षात केलेल्या विकासकामांचे व्हिजन घेऊन आ.संग्राम जगताप निवडणुकीत उतरले आहेत. त्यांनी सर्व जनतेपुढे २०२४ चे व्हिजन मांडले आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विरोधी उमेदवाराकडे कोणतेही व्हिजन नसून, प्रचाराचे मुद्देही नाहीत. शहराच्या विकासासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. जाती-पातीत तेढ निर्माण करुन दंगली घडविणे, कुटूंबांमध्ये भांडण लावणे एवढाच त्यांचा धंदा आहे. त्यांचा … Read more

विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही

कर्जत : विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, त्याची सुरुवात ना. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात केली आहे. विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही की, फिरवली की झाला विकास. ना. शिंदे या सर्वसामान्य व्यक्तीकडे ना कारखाना होता, ना शिक्षण संस्था, ना पैसा. तरीही त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर मतदारसंघात विकासाची प्रक्रिया सुरू केली, ही त्यांची … Read more

लोकसभेप्रमाणेच आघाडीचे पानिपत होईल

अहमदनगर : नगर तालुक्यातील बहुतांशी पाणी योजना शिवसेनेने आणल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांनी खोटे बोलून दिशाभूल करुन श्रेय लाटू नये. शिवसैनिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत. मागील ५ वर्षात सत्तेच्या विरोधातील आमदार निवडून दिल्याने तालुक्याची पिछेहाट झाली. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याने मागील ५ वर्षे जनतेने शिक्षा भोगली आहे. असे टीकास्त्र शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. गाडे … Read more

मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील !

कर्जत : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही; परंतु ठराविक उद्योजकांसाठी मोठ-मोठ्या सवलती दिल्या जातात, याला नेमकं काय म्हणायचं? भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची मोठी उपेक्षा केली असून, त्याची किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे. मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. महाआघाडीच्या … Read more

अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी काढली … Read more

आमदारकीचा षटकार ठोकणार: आ. कर्डिले

अहमदनगर : जेऊर गटामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. नगर नेवासा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यानंतरही राहुरी मतदार संघात जेऊर गट आहे. आणि तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने मी सहाव्या वेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास आ. शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला. आ. कर्डिले यांनी नगर तालुक्यातील ४० गावांमध्ये रॅली काढत जेऊर … Read more

अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी शहर : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी … Read more

कुत्र्याच्या हल्ल्यात नवजात अर्भकाचा मृत्यू

गोंदा : अवघ्या एक तासापूर्वी जन्मलेल्या जनजात अर्भकावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात या जवजात अर्भकाचा मृत्यू झाला तर त्या अर्भकाची आई जखमी झाली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे शनिवारी घडली. याबाबत सविस्तर असे की, मौजे कर्जत (तालुका.मावळ, जिल्हा.पुणे) येथील मूळचे रहिवाशी असलेले, गुलाब पप्पू कोली गेल्या एक दीड महिन्यापासून कुटुंबासह पेडगाव … Read more

त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते

राहुरी: शहरातील नागरिकांचे सर्व प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सोडवू. सत्ता असताना अनेक वर्षात नगरपालिकेची साधी पाणीपुरवठा योजना करता आली नाही, त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते. अशी टीका आ.शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केली. राहुरी येथे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी पेठेतून प्रचार फेरी काढली. यावेळी नागरिकांशी संपर्क साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंर्त्यांकडे पाठपुरावा … Read more

शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. ते माझ्या आजोबांचे मित्र होते. शरद पवार यांनी सातारा येथे भरपावसात जी सभा घेतली ते खरेच कौतुक करण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत. भाजपा असेल वा शिवसेना सध्या निवडणुकांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसलाच दोन्ही पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी लक्ष्य केले … Read more