भर पावसात सभा घेण्याची वेळ नसती आली

सातारा : आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुष्काळी भागातील पाणी योजना पूर्ण केल्या असत्या आणि दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणाऱ्या पाणी योजनांमध्ये ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता, तर त्यांना आज भरपावसात सभा घेण्याची वेळच आली नसती. मतदारांनी त्यांना घरी बसूनच मते देऊन निवडून दिले असते, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांचे … Read more

दोन भैयांच्या लढतीत कोणाचं पारडं जड?

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार तसेच अहमदनगर चे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील ही अतिटतीची लढत शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे.   शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना युती न होण्याचा फटका बसल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला.  मात्र मागील पाच … Read more

बारामतीचे आक्रमण परतवून लावा !

अकोले :- विधानसभेची निवडणूक हि विकासाची नांदी असून लोकांनीच ती हाती घेतली आहे. समोरच्या लोकांकडे निंदा,नालस्ती करणे व अपशब्द वापरणे हाच कार्यक्रम आहे. याला उत्तर मतदानातून द्या आणि बारामतीचे आक्रमण परतवून लावा, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अमित … Read more

आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिवस गोड करा

सोनई : गेली चार ते पाच दशके मी या परिसरात व नेवासा तालुक्यात राबलो. या माझ्या तालुक्यात समृद्धी आणायची, एवढी एकच जिद्द मनात होती. माझ्या त्या स्वप्नांना माझ्या पिढीच्या लोकांनी साथ दिली, म्हणून ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो. आता आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिस गोड व्हावा, एवढी एकच इच्छा आणि अपेक्षा तुमच्याकडून आहे, असे भावपूर्ण आवाहन … Read more

मोदी-शहांनीही केले राम शिंदेंकडे दुर्लक्ष !

कर्जत :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही राम शिंदे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. भाजपाच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये राम शिंदे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने त्यांची जागा धोक्यात असल्याची बाब पुढे आली होती. मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी नेमक्या विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण निवडणूक … Read more

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही सभा दोन दिवसांपूर्वी … Read more

होय, मी मतदान करणार

अहमदनगर ;- विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे मतदारांचे स्वाक्षरी अभियान राबवून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. होय, मी मतदान करणार या आशयाखाली हे अभियान राबविण्यात आले असून, या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला आपण करुया मतदानचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि.18 ऑक्टोबर) निमगाव वाघा येथे … Read more

मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला

अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्‍वास ठेवणार नाही. अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील … Read more

युवक काँग्रेसच्या ‘वेकअप महाराष्ट्र ‘ ट्रेंडला ट्विटरवर उदंड प्रतिसाद

मुंबई :- विधानसभेच्या मतदानाचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज ‘वेकअप महाराष्ट्र ‘या हॅशटॅगच्या नावाने ट्विटरवर केलेल्या ट्रेंडला महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊन  वेकअप महाराष्ट्राच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले. विधानसभेचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज ‘ वेकअप … Read more

विकासकामात आडकाठी आणण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले…

शिर्डी – पुढाऱ्यांमध्ये भांडणे लावून जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या शरद पवार यांनी प्रचारादरम्यान जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर एक शब्दही उच्चारला नाही. जिल्ह्याचे वाळवंट करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्याची योग्य संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. अस्तगाव येथे प्रचार सांगता सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. खासदार … Read more

ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर : राजळे

शेवगाव –  गेल्या पाच वर्षांत जनहिताच्या कोणत्याही मुद्द्यावर न बोललेले, तसेच लोकांच्या सुख-दु:खात सामील न झालेले आज जात-पात व भावनेचा विषय काढून दिशाभूल करत आहेत. ही निवडणूक भावनेच्या नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवत आहोत, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.  भाजपच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी जनता व्यासपीठावर झाली. सभेपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

श्रीगोंद्याला गतवैभव मिळवून देणारच – पाचपुते

श्रीगोंदे घोड व कुकडीचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष, ऊस, लिंबूसह अन्य पिकांची स्थिती चांगली असून या पुढेही पाणी नियमानुसार घेऊ, असे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी शनिवारी पारगाव येथे सांगितले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाचपुते म्हणाले, मी चाळीस वर्षे काय केले, या विरोधकांच्या प्रश्नात राजकारण आहे. जे प्रश्न करतात, … Read more

मतदार ओळखपत्र नसल्यास या ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य

मुंबई : येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 11 पुरावे : पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, … Read more

भाजपात राम शिल्लक राहणार नाही…

कर्जत – राज्यात सध्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीची जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री तीनदा इथे येऊन गेले, पण मतमोजणीनंतर भाजपत राम शिल्लक राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी कर्जत येथे सभा घेतली. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या सभेच्या तुलनेत येथील सभेला पाऊस … Read more

नगरकर कोणता भैया विधानसभेत पाठवणार?

अहमदनगर –  शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांची लढत चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. खरतरं, या दोन्ही नेत्यांना नगरकर मोठ्या आदराने ‘भैय्या’ अशी हाक मारत असले तरी मतदानावेळी नेमकं कोणत्या ‘भैय्या’ ला पसंदी देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  नगर शहराचं राजकारण तसं जगताप, कोतकर, कळमकर यांच्याबरोबर राठोड, गांधी, … Read more

निळवंडेचे पाणी तुमच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पूर्ण करणार : ना. विखे

राहाता – निळवंडेच्या कालव्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. डिसेंबर २०२० अखेर निळवंडेचे पाणी लाभक्षेत्राला मिळेल, याची जबाबदारी माझी आहे. १२०० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने कालव्यांच्या खोदाईला सुरुवात झाली. विखे पाटलांना बदनाम करण्याचे काम काहिंनी केले, कामे सुरु झाली. निळवंडे कालवा कृती समिती आता कशाला? असा सवाल करत पाणी येणार आहे. तुमची प्रामणिक भूमिका असेल तर … Read more

कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही…’

श्रीरामपूर – ‘श्रीरामपुरातील आता जसे राजकारण सुरू आहे तसेच चालू राहू द्या डिस्टर्ब करु नका.. पण श्रीरामपूरची परिस्थिती पहाता मीच डिस्टर्ब झालो आहे… श्रीरामपुरात कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही… ‘अशा शब्दात खा. डॉ. सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली.  त्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी जोरदार साथ दिल्याने सभेचा नूर बदलून … Read more

भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा -खा. डॉ. सुजय विखे

श्रीरामपूर – येत्या २४ ऑक्टोबरला राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघाचे रस्त्याचे प्रश्न असो किंवा सर्वात महत्वाचा पाटपाण्याचा प्रश्न असो त्यात हक्काचे पाणी मिळण्यासाठी सरकार पक्षाचे आमदार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा, असे आवाहन खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केले. श्रीरामपुरात काल … Read more