भारतातील हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली ‘ही’ जुनी शहरे तुम्हाला माहितीयेत का?, एकाचा चाणक्यांनीही केलाय उल्लेख!

Updated on -

Ancient Indian Cities: भारताचा ऐतिहासिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. इथे अशी अनेक शहरे आहेत जी हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत आणि ज्यांचं महत्त्व आजही कायम आहे. या शहरांचा उल्लेख केवळ भारतीय ग्रंथांमध्ये नाही, तर प्राचीन परदेशी प्रवाशांच्या आणि मुत्सद्दींच्या नोंदींमध्येही आढळतो. अशाच 5 ऐतिहासिक शहरांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, ज्यांचा संबंध मौर्य, गुप्त, विजयनगर आणि पांड्य राजवटीसारख्या प्राचीन साम्राज्यांशी आहे.

वाराणसी, उत्तर प्रदेश

गंगा नदीच्या काठावर वसलेले वाराणसी, ज्याला काशी किंवा बनारस असेही म्हटले जाते, हे भारतातील आणि जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून या शहराला अतिशय महत्त्व आहे. वाराणसीचा उल्लेख वेद-पुराणांपासून बुद्धकालीन ग्रंथांपर्यंत दिसून येतो.

हंपी, कर्नाटक

हंपी हे शहर विजयनगर साम्राज्याची राजधानी होते. 14 व्या शतकात उभारले गेलेल्या या शहराचे अवशेष आजही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणले जातात. पंपा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण मंदिरांची वास्तुकला, कोरीव शिल्पे यासाठी ओळखले जाते.

अजमेर, राजस्थान

राजस्थानातील अजमेर शहराची स्थापना राजा अजय पाल चौहान यांनी केली होती. हे शहर 12 व्या शतकात चौहान राजवंशाचे केंद्र होते. येथे असलेले अजमेर शरीफ दर्गा हे भारतातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असून विविध धर्मीय लोक श्रद्धेने येथे भेट देतात.

पाटणा (पाटलीपुत्र), बिहार

गंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर मौर्य, गुप्त व इतर अनेक साम्राज्यांची राजधानी होते. प्राचीन काळी याला पाटलीपुत्र म्हणत. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांसारख्या सम्राटांनी येथून राज्यकारभार केला. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आजही पाहायला मिळतात.

मदुराई, तामिळनाडू

मदुराई हे शहर पांड्य राजवटीचे मुख्य केंद्र होते. याचा उल्लेख चाणक्य व ग्रीक मुत्सद्दी मेगास्थेनिस यांनीही केला आहे. येथील मीनाक्षी अम्मन मंदिर हा दक्षिण भारतातील एक प्रमुख आकर्षणबिंदू असून, याचे वास्तुकलेचे सौंदर्य जगभर प्रसिध्द आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe