काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला झेंडा ; घडलेच असे काही की

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशभरात भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण पेटले आहे. रविवारच्या दिवशी डॉ. गोविंद सिंह आणि विश्वास सारंग एकमेकांसमोर आले आणि नवा वाद उभा राहिला आहे.

कोणीतरी येऊन काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भगवा झेंडा फडकवला आणि मग नवीन वाद उभा राहिला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या प्रकरणी मध्य प्रदेश कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, भगवा रंग मान सन्मानाचे प्रतीक आहे. काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेत.त्यामुळे त्यांच्या पक्षाची दुर्दशा झाली आहे.

काँग्रेस पक्षाने भगव्याचा आदर करायला हवा.गोविंद सिंह यांच्या म्हणण्यानुसार आमदारांच्या प्रश्नावर भाजपा पळ काढू राहिलीय.

तर विश्वास सारंग यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस नेत्यांवर खोटी इंधने करून विधानसभा अधिवेशन तहकूब केल्याचा आरोप केला आहे . माजी मंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी माध्यमात सांगितले.

विधानसभेत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरे दिली पाहिजेत.सध्या विधानसभेत बावीस हजार प्रश्न प्रलंबित आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe