नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास मिळणार 5 लाख 55 हजार रुपयांचे व्याज!
- दिवाळीत सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार! ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त गृह कर्ज
- मारुती सुजुकीच्या ‘या’ SUV वर मिळतोय १.८० लाख रुपयांचा डिस्काउंट ! दिवाळीच्या आधीच ग्राहकांची चांदी
- वाहन विक्री बाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल ! गाडी विकताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
- 6 महिन्यात पैसे डबल करणाऱ्या ‘या’ कंपनीची Bonus Shares ची घोषणा ! कंपनी 3 बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करा