नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- मोठी बातमी ! ‘हा’ 76 किलोमीटर लांबीचा मार्ग लवकरच खुला होणार, कसा असणार रूट ? वाचा सविस्तर
- मोठी बातमी ! ‘या’ मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 3 तासात 36 बोगद्यांमधून धावणार हायस्पीड ट्रेन, कसा असणार रूट?
- राजधानी मुंबई ते नाशिक दरम्यान धावणार लोकल ट्रेन ! ‘या’ नव्या रेल्वे मार्गाला मिळाली मंजुरी, कसा असणार रूट? वाचा….
- भारतातील टॉप १० कॉलेजची यादी ! तुमची मुले इथे शिकायला गेली तर लाईफ होणार सेट
- अहिल्यानगरमधील ‘या’ दोन साखर कारखान्याच्या कामगारांवर आर्थिक संकट, गळीत हंगाम कमी झाल्याने ले-ऑफची टांगती तलवार!