नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- अहिल्यानगर जिल्ह्यातील हा महामार्ग 6 पदरी होणार ! मध्यप्रदेश, दिल्लीतून शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे ५५ मिनिटे वाचणार
- एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! RBI च्या निर्णयानंतर ग्राहकांना दिला मोठा झटका
- जादा दराने खतांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, आमदार मोनिका राजळे यांच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना सूचना
- अहिल्यानगरमधील ५६३ शेतकऱ्यांचे ठिंबक सिंचनाचे तब्बल ८१ लाख रूपयांचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले, शेतकरी हवालदिल
- अहिल्यानगरमधील ‘त्या’ प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सीआयडी पथक पारनेरमध्ये तीन दिवसांपासून तळ ठोकून, पोलिसांवर नाराजी