नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- यंदा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार ! शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सुट्ट्याच वेळापत्रक समोर
- Explained : तनपुरेंचा विजय म्हणजे विखेंचा बदला ? जाणून घ्या पडद्यामागचं राजकारण!
- राजधानी मुंबई ते कोकण दरम्यान तयार होणार नवीन एक्सप्रेस वे ! मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास फक्त चार तासात, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार? किती वाढणार रिटायरमेंट एज? समोर आली मोठी अपडेट
- 1959 साली 1 तोळा सोन्याची किंमत किती होती ? जून बिल झालं प्रचंड व्हायरल