नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय
- Kia Sonet वर भन्नाट ऑफर ! 2 लाखांत कार तुमची… विश्वास बसणार नाही अशी ऑफर!
- आनंदाची बातमी ! 589 किमीचे मुंबई-गोवा अंतर आता फक्त 6 तासात कापले जाणार; रेल्वेने नाहीतर समुद्रमार्गे सुपरफास्ट प्रवास, कधी सुरु होणार जलवाहतूक ?
- Navpancham Rajyog : एप्रिलमध्ये घडणार मोठी घटना ! नवपंचम राजयोगाने 3 राशींचे नशीब बदलणार
- Vastu Tips | तुम्ही तुमच्या पर्समध्ये ‘या’ वस्तू ठेवल्यात तर 100% कर्जबाजारी व्हाल, कितीही कमवा पण हातात पैसा राहणार नाही