10 हजार चीनी सैनिकांशी लढणारा भारतीय योद्धा, ज्याच्या नावाने तिबेट थरथर कापत होतं! वाचा जनरल जोरावर सिंग यांची पराक्रमी गाथा

Published on -

अनेकदा इतिहासात असे धगधगते क्षण असतात, जे आपल्याला एखाद्या महान योद्ध्याच्या पराक्रमाची आठवण करून देतात. भारताच्या शौर्यगाथेतही अशाच एका विस्मरणात गेलेल्या पण अत्यंत पराक्रमी योद्ध्याची कहाणी दडली आहे – जनरल जोरावर सिंग. त्यांचं नाव आज फारसं ऐकू येत नाही, पण एकेकाळी त्यांच्या धाडसामुळे तिबेट आणि चीनसारखी साम्राज्यं थरथर कापत होती. युद्धभूमीवर त्यांच्या आगमनाची चाहूल लागताच शत्रू सैनिक मैदान सोडून पळ काढायचे.

जनरल जोरावर सिंग यांची गाथा-

ही कहाणी आहे 19 व्या शतकातील. तेव्हा भारतावर अनेक आक्रमकांचा धोका होता आणि जम्मू व काश्मीरचे महाराज गुलाब सिंग आपल्या साम्राज्याचा विस्तार करत होते. याच काळात त्यांनी आपल्या डोगरा सैन्याच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली ती जनरल जोरावर सिंग यांच्यावर. तेव्हा त्यांचं वय काहीसं मध्यम असलं, तरी आत्मविश्वास, रणनीती आणि निर्भीडता यामुळे त्यांचं नाव आधीच झळकत होतं.

1834 साली त्यांनी लडाखकडे मोर्चा वळवला. जवळपास 5,000 डोगरा सैनिक त्यांच्या सोबत होते. ही मोहीम एखाद्या सैनिकी चमत्कारासारखी होती. उंच पर्वतरांगा, कठीण हवामान आणि अनोळखा भूभाग – या सगळ्यांवर मात करत जोरावर सिंग आणि त्यांच्या सैन्याने लडाखच नव्हे तर गिलगिट, बाल्टिस्तान आणि अगदी पश्चिम तिबेटपर्यंत आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं. त्यांचं धाडस इतकं प्रभावी होतं की, तिबेटी सैन्याच्या छावणीत त्यांच्या नावानेसुद्धा धडकी भरायची.

एक वेळ अशी आली की, 1841 साली जेव्हा ते पुन्हा पश्चिम तिबेटच्या मैदानात पोहोचले, तिथलं सैन्य त्यांचं नाव ऐकताच पळून गेलं. पण त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे तिबेटी सैन्याने चीनकडून मदत मागितली आणि 10,000 पेक्षा जास्त सैनिकांसह जोरावर सिंग यांच्यावर आक्रमण केलं. ही लढाई साधी नव्हती. तेव्हा तापमान -50 अंश सेल्सिअसच्या खाली होतं. हवामान नुसतं थंडच नव्हतं, तर जीवघेणं होतं.

या युद्धात जोरावर सिंग गंभीर जखमी झाले आणि शेवटी शहीद झाले. पण त्यांचं सैन्य मात्र शेवटपर्यंत लढलं आणि शत्रूंच्या सेनापतीला ठार मारून विजय मिळवला.

आज आपण जेव्हा भारताच्या सीमावर्ती भागांकडे पाहतो, तेव्हा या भागांमागे अशा शूर वीरांचं रक्त मिसळलेलं असतं. जोरावर सिंगसारख्या योद्ध्यांमुळेच भारताची सीमारेषा इतकी मजबूत आहे. त्यांच्या शौर्याची गाथा ही केवळ भूतकाळातली कहाणी नाही, तर प्रेरणादायी इतिहास आहे – जो नव्या पिढीला धैर्य, नेतृत्व आणि मातृभूमीप्रेम शिकवतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News