मोदी सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा यामुळे पुन्हा एकदा उघड झाला.

Published on -

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने विदेश व्यापार कायदा १९९२ अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केला. मोदी सरकारने बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला.

या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला.

यासंदर्भात डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने नुकतेच कांदयासह पाच प्रकारचे शेतमाल आवश्यक वस्तू कायद्यातून वगळले असल्याची घोषणा केली होती.

भाजप समर्थक शेतकरी संघटनांनी सरकारच्या या घोषणेचे तोंड भरून कौतुक करताना कांदा उत्पादकांना आता सोन्याचे दिवस येतील, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.

प्रत्यक्षात मात्र मोदी सरकारच्या “त्या निर्णयाचे” पडघम हवेतून विरण्यापूर्वीच कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे. मोदी सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा यामुळे पुन्हा एकदा उघड झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe