Monsoon Update: पंजाबरावांचा 8 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज आला..! हवामानात अचानक बदल, ‘या’ जिल्ह्यात पाऊस, ‘या’ जिल्ह्यात पावसाची विश्रांती

Monsoon Update: राजधानी मुंबई समवेतच राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Monsoon) विश्रांती घेतली आहे. मात्र असे असले तरी विदर्भातील काही जिल्ह्यांत अजूनही पावसाचा (Monsoon News) धुमाकूळ बघायला मिळत आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील पाच जिल्ह्यात उद्यापर्यंत पावसाचा (Rain) अलर्ट जारी केला आहे. आज राज्यातील एकूण दहा जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, ,सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात आज मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

मित्रांनो या शिवाय चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये उद्या देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो असा भारतीय अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे पावसाने उसंत घेतली म्हणून समाधानी झालेल्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे ढग बघायला मिळत आहेत.

भारतीय हवामान विभागाव्यतिरिक्त राज्यातील प्रसिद्ध हवामान तज्ञ परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता सार्वजनिक करण्यात आला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या 8 ऑगस्ट पर्यंतच्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), 29 ते 30 जुलै पर्यंत राज्यातील पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात तसेच धाराशिव, लातूर नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यात देखील पंजाबरावांनी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

पंजाबराव यांच्या मते 30 जुलैपर्यंत पडणारा हा पाऊस या जिल्ह्यात सर्वदूर नसणार, म्हणजेच या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पण मोठा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे. मात्र असे असले तरी 31 जुलै पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर हवामान कोरडे राहणार आहे.

पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात सूर्यदर्शन कायम राहणार आहे. पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना 3 ऑगस्टपर्यंत शेतीची सर्व कामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे. तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, त्यानंतर चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर अतिशय मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता या वेळी पंजाबराव यांनी वर्तवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe