Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून पावसाने (Monsoon) विश्रांती घेतली असल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र काल दुपारनंतर विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली.
तसेच भारतीय हवामान विभागाने आज 31 जुलै रोजी पुन्हा एकदा विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते दुपारनंतर विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची (Monsoon News) शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बसणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्रातील विदर्भाच्या बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हवामान तज्ञ आणि आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांनी आपल्या नवीनतम हवामान अंदाजात (Panjab Dakh Weather Report) ऑगस्ट महिन्यातील देखील अंदाज वर्तवला आहे. पंजाबरावांनी (Panjabrao Dakh) वर्तवलेल्या 8 ऑगस्ट पर्यंतच्या हवामान अंदाजानुसार, 31 जुलै पासून म्हणजे आजपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. या कालावधीत राज्यात कोणत्याच भागात पाऊस राहणार नाही.
तीन ऑगस्ट पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याने या कालावधीत शेतकरी बांधवांनी आपली राहिलेली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला देखील पंजाब रावांनी (Panjabrao Dakh News) दिला आहे. वाफसा आल्यानंतर शेतकरी बांधवांनी शेतीशी संबंधित सर्व कामे या कालावधीत उरकून घेणे महत्त्वाचे आहे. कारण की 3 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा हवामानात मोठे बदल होणार आहेत.
चार ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. 4 ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे. निश्चितच 31 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत पावसाची उघडीप राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपली शेतीची कामे उरकवून घ्यावीत.